Saturday, May 4, 2024
Homeदेश विदेशआसाममध्ये भूस्खलन; 20 ठार, 9 गंभीर

आसाममध्ये भूस्खलन; 20 ठार, 9 गंभीर

सार्वमत

गुवाहाटी – संततधार पावसामुळे आसाममधील तीन भागात झालेल्या भूस्खलनामुळे 20 जणांचा मृत्यू झाला आहे.

- Advertisement -

मृतांमध्ये महिला, मुले आणि वृद्धांचाही समावेश आहे. ही दुर्घटना दक्षिण आसाम, काचार, हैलाकांडी आणि करीमगंज या तीन जिल्ह्यांत घडली. यात गंभीर जखमी झालेल्या 9 जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

या भीषण दुर्घटनांमध्ये एकाच कुटुंबातील अनेकांचा समावेश आहे. मंगळवारी पहाटेच्या वेळी, लोक घरात झोपले असताना हे भूस्खलन झाले. झोपलेले असल्याने भूस्खलनातून लोकांना वाचता आले नाही. यात लोकांची घरे उध्वस्त झाली आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या