Friday, May 16, 2025
Homeमहाराष्ट्रमहाराष्ट्रातील व्याघ्र प्रकल्पांसाठी २९५ कोटींचा निधी

महाराष्ट्रातील व्याघ्र प्रकल्पांसाठी २९५ कोटींचा निधी

नवी दिल्ली | प्रतिनिधी

- Advertisement -

महाराष्ट्रातील व्याघ्र प्रकल्पांसाठी केंद्र पुरस्कृत योजनांमधून गेल्या साडेतीन वर्षात 295 कोटी 13 लाख 2 हजार 500 रुपयांचा निधी वितरित झाला आहे.

केंद्रीय वने व पर्यावरण तथा हवामानबदल मंत्रालयाच्या वतीने देशातील 18 राज्यांमधील व्याघ्र प्रकल्पांच्या विकासासाठी गेल्या तीन वर्षात व चालू आर्थिक वर्षात एकूण 1 हजार 221 कोटी 65 लाख 89 हजार 500 रुपयांचा निधी वितरित करण्यात आला आहे.

महाराष्ट्रातील व्याघ्र प्रकल्पांना 295 कोटी 13 लाख   

महाराष्ट्रातील व्याघ्र प्रकल्पांसाठी वर्ष 2016-17 ते 2018-19 या मागील तीन आर्थिक वर्षात एकूण 258 कोटी 3 लाख 47 हजार 500 रुपयांचा निधी वितरित करण्यात आला. तर चालू आर्थिक वर्षात आतापर्यंत (21 नोव्हेंबर 2019) 37 कोटी  9 लाख 55 हजारांचा  निधी वितरित करण्यात आला आहे.

वर्ष 2016-17 ते 2018-19 या मागील तीन आर्थिक वर्षात देशातील 18 राज्यांमधील व्याघ्र प्रकल्पांसाठी एकूण 1 हजार 10 कोटी 42 लाख  8  हजार 400 रुपयांचा निधी वितरित करण्यात आला. तर चालू आर्थिक वर्षात आतापर्यंत (21 नोव्हेंबर 2019) 211 कोटी 23 लाख 81  हजारांचा  निधी वितरित करण्यात आला आहे.

केंद्रीय वने व पर्यावरण तथा हवामानबदल राज्यमंत्री बाबुल सुप्रियो यांनी आज राज्यसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात ही  माहिती दिली.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Shirdi : ना. विखेंच्या अध्यक्षतेखाली साई संस्थानच्या व्यवस्थापनासाठी प्रशासकीय समिती स्थापन

0
शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi शिर्डीच्या श्री साईबाबा संस्थानच्या व्यवस्थापनाचे नियंत्रण आणि कार्यान्वयन अधिक प्रभावीपणे होण्यासाठी राज्य शासनाकडून प्रशासकीय समिती स्थापन करण्यासाठी साईबाबा संस्थानला कळवण्यात आले...