Sunday, March 30, 2025
Homeनाशिकमोठी बातमी! भावली धरणात पाच जण बुडाले

मोठी बातमी! भावली धरणात पाच जण बुडाले

इगतपुरी | प्रतिनिधी | Igatpuri 

तालुक्यात असलेल्या भावली धरणावर (Bhavali Dam) नाशिकरोड येथून फिरण्यासाठी आलेल्या पाच जणांचा भावली धरणामध्ये बुडून मृत्यू (Death) झाल्याची घटना घडली आहे.

- Advertisement -

याबाबत अधिक  माहिती अशी की, अनस खान दिलदार खान (वय १५), हनीफ अहमद शेख (वय २४), मीजबाह दिलदार खान (वय १६), नाझिया इमरान खान (वय १५) व ईकरा दिलदार खान (वय १४) अशी मृतांची नावे असून मृतांमध्ये तीन मुली व दोन मुलांचा समावेश आहे. मृत पावलेले हे सर्वजण गोसावी वाडी, जेलरोड, नाशिकरोड येथील रहिवासी आहेत.

आज मंगळवार (दि. २१) रोजी संध्याकाळच्या सुमारास ही घटना घडली आहे. नाशिकरोड (Nashik Road) येथून एकूण नऊ जण भावली धरणावर रिक्षेतून फिरण्यासाठी आले होते. त्यापैकी पाच जणांचा बुडून मृत्यू झाला असून चार जण वाचले आहेत. हे सर्वजण एकमेकांचे नातेवाईक होते.

दरम्यान, हे पाचही जण बुडाल्याचे समजताच स्थानिक आदिवासी नागरिकांच्या मदतीने त्यांचे मृतदेह बाहेर काढून इगतपुरी येथील रुग्णालयात (Hospital) दाखल करण्यात आले. तसेच घटनेची माहिती मिळताच मृतांचे नातेवाईक रुग्णालयात दाखल झाले असून या घटनेमुळे गोसावी वाडी परिसरात शोककळा पसरली आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Shirdi : साईंच्या पादुका बाहेर नेण्यास काही ग्रामस्थांचा विरोध तर काहींचा...

0
शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi येथील साईबाबांच्या मुळ चर्म पादुका साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्थेच्या वतीने 10 एप्रिलपासून दक्षिण भारतात नेण्याचा निर्णय घेतला आहे. पंधरा दिवसात पादुका दोन...