Friday, May 3, 2024
Homeमुख्य बातम्याराज्यात ६१ हजार कोटींची गुंतवणूक अपेक्षित

राज्यात ६१ हजार कोटींची गुंतवणूक अपेक्षित

मुंबई । प्रतिनिधी

करोना संकट काळातही उद्योजक आणि आघाडीच्या उद्योग कंपन्यांचा आर्थिक गुंतवणुकीसाठी महाराष्ट्राकडे कल असल्याचे मंगळवारी पुन्हा स्पष्ट झाले.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत आज २५ कंपन्यांसोबत तब्बल ६१ हजार ४३ कोटी रुपयांचे सामंजस्य करार करण्यात आले. या माध्यमातून २ लाख ५३ हजार ८८० लोकांना रोजगार उपलब्ध होणार आहेत.

- Advertisement -

उद्योग विभागाच्यावतीने मग्नेटिक महाराष्ट्र २.० अंतर्गत वर्षभरात थेट विदेशी गुंतवणूक आणि देशातील आघाडीच्या विविध कंपन्यांसोबत सामंजस्य करार करुन महाराष्ट्राने मागील वर्षभरात २ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक आकर्षित केली आहे. करोना संकटाच्या काळात सहा महिन्यातच एक लाख बारा हजार कोटींची गुंतवणूक ही निश्चितच संपूर्ण देशासाठी महाराष्ट्राचे एक उत्तम उदाहरण आहे, असे उद्धव ठाकरे यांनी यावेळी सांगितले.

जगावर कोरोनाचे संकट असताना सुद्धा महाराष्ट्रात उद्योग विभागाने कमी कालावधीत २ लाख कोटींचे उद्दीष्ट पूर्ण केले. हा समाधान, अभिमान वाटेल असा क्षण आहे, असे सांगून ठाकरे यांनी सुभाष देसाई आणि त्यांच्या टीमचे अभिनंदन केले.

करोनाचे संकट टळलेले नाही. सध्या कोरोनाची परिस्थिती समाधानकारक असली तरी युरोपात स्ट्रेन वेगाने पसरतोय. या गुंतवणूकीत पिझ्झा, आइसक्रीम आहे. शेततळे आहे, दूध आहे. मॅग्नेटीक महाराष्ट्राला तुमची ताकद मिळत आहे. त्यामुळेच महाराष्ट्रात गुंतवणूक होत आहे. घरातून ताकद मिळल्यानंतर हत्तीचे बळ मिळते. महाराष्ट्राच्या परिवारातील तुम्ही सर्व आहात. तुम्हाला बाहेर जाण्याची गरज नाही. देशाच्या प्रगतीची धारणा महत्वाची आहे. कष्ट करण्याची तयारी आपल्या अंगी असेल तर नक्कीच महाराष्ट्र प्रगतीच्या दिशेने वाटचाल करेल, असा विश्वास ठाकरे यांनी व्यक्त केला.

‘उद्योग मित्र’ ही संकल्पना उत्तम असून त्यामुळे उद्योजकांच्या अडचणी लवकर दूर होतील आणि कामाला गती मिळेल. उद्योजकांनी या संकटाच्या काळात देखील महाराष्ट्रात गुंतवणूक केली हे महत्वाचे आहे. महाराष्ट्र सरकार आपल्या सोबत राहील, असेह उद्धव ठाकरे यांनी उद्योजकांना आश्वासित केले.

यावेळीउद्योग राज्यमंत्री अदिती तटकरे, उद्योग विभागाचे प्रधान सचिव बी. वेणूगोपाल रेड्डी, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे कार्यकारी अधिकारी डॉ.पी.अनबलगन, उद्योग प्रतिनिधी म्हणून जिंदाल ग्रुपचे चेअरमन सज्जन जिंदाल तसेच विविध कंपन्याचे प्रतिनिधी उपस्थित होते.

आज झालेल्या सामंजस्य करारातील कंपन्या

एक्साईड इन्डस्ट्रीज, भारत बॅटरी मॅन्युफॅक्चरिंग, (500 कोटी गुंतवणूक 1000 रोजगार निर्मिती), श्रीधर कॅाटसाइन वस्त्रोद्योग, (369 कोटी गुंतवणूक,520 रोजगार निर्मिती), ज्युबिलन्ट फूड वर्क्स, अन्नप्रक्रिया (150 कोटी गुंतवणूक, 400 रोजगार निर्मिती, जेएसडब्ल्यू स्टील, स्टील 20 कोटी 3000 रोजगार निर्मिती, गोयल गंगा, आयटी पार्क 1000 कोटी गुंतवणूक,10 हजार रोजगार निर्मिती, जी जी मेट्रोपॉलिस, आयटी पार्क 1500 कोटी गुंतवणूक 15 हजार रोजगार निर्मिती, सेंच्युर फार्मास्युटिकल लिमिटेड, फार्मासिटीकल 300 कोटी गुंतवणूक, 1500 रोजगार निमिर्ती, ग्रँव्हिस भारत,अन्नप्रक्रिया 75 कोटींची गुंतवणूक 100 रोजगार निर्मिती, के. रहेजा, माहिती तंत्रज्ञान 7 हजार 500 कोटी गुंतवणूक 70 हजार रोजगार निर्मिती,

इंडियन कॉर्पोरेशन लॉजिस्टीक, लॉजिस्टीक 11049.5 कोटी गुंतवूणक 75 हजार रोजगार निर्मिती, बजाज ऑटो ऑटो अँड ऑटो कंपोनंट, 650 कोटी गुंतवूणक 2500 रोजगार निर्मिती, सुमेरू पॉलिस्टर एलएलपी, वस्त्रोद्योग 425 कोटी गुंतवूणक 500 रोजगार निर्मिती,नवापूर इंडस्ट्रीयल पार्क एलएलपी, इंडस्ट्रीयल इन्फ्रास्ट्रक्चर 200 कोटी गुंतवणूक, 100 रोजगार निर्मिती, कीर्तीकुमार स्टील उद्योग, स्टील उत्पादन 7 हजार 500 कोटी गुंतवणक, 60 हजार रोजगार निर्मिती, इन्स्पायर इन्फ्रा (औरंगाबाद) लि. इंटिग्रेटेड इंडस्ट्रियल एरिया 7 हजार 500 कोटी गुंतवणूक 10 रोजगार निर्मिती,

जेनक्रेस्ट बायो प्रॉडक्ट, वस्त्रोद्योग 500 कोटी गुंतवणूक 500 रोजगार निर्मिती, मलक स्पेशालिटीज, केमिकल 45.56 कोटी गुंतवणूक 60 रोजगार निर्मिती, अम्बर एन्टरप्रायझेस इंडिया लि.मॅन्युफॅक्चरिंग 100 कोटी गुंतवणूक, 220 रोजगार निर्मिती, ग्रॅंड हॅण्डलूम फर्निचर प्रा. लि.वस्त्रोद्योग 106 कोटी गुंतवणूक 210 रोजगार निर्मिती, अॅम्पस फार्मटेक्स इंडस्ट्रीज, इंजिनिअरींग 104 कोटी गुंतवणूक, 220 रोजगार निर्मिती, क्लिन सायन्स ऍण्ड टेक्नॉलॉजी प्रा. लि., केमिकल 132.4 कोटी गुंतवणूक 750 रोजगार निर्मिती, सोनाई इडेबल इंडिया प्रा लि. अन्न, खाद्य तेल रिफायनरी 189.57 कोटी गुंतवणूक 300 रोजगार निर्मिती, सुनील प्लास्टिक इंडस्ट्रीज, डेव्हलपर 110 कोटी गुंतवणूक 500 रोजगार निर्मिती, रिन्युसिस इंडिया प्रा लि, तरिन्युएबल एनर्जी 500 कोटी गुंतवणूक 1500 रोजगार निर्मिती, हरमन फिनोकेम, केमिकल 536.5 कोटी गुंतवणूक 1500 रोजगार निर्मिती.

- Advertisment -

ताज्या बातम्या