Saturday, May 4, 2024
Homeनाशिकत्र्यंबकमध्ये तीन गावांचा संपर्क तुटला

त्र्यंबकमध्ये तीन गावांचा संपर्क तुटला

त्र्यंबकेश्वर । Trimbakeshwar

गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे (rain) त्र्यंबकेश्वर तालुक्यातील (Trimbakeshwar taluka) पिंपळद गावच्या (Pimplad Village) किकवी नदीच्या (kikvi river) पुलावरून पाणी गेल्याने ब्राम्हणवाडे (Brahmanwade) माळेगांव (Malegaon) या गावांचा संपर्क तुटला आहे.

- Advertisement -

तसेच पुलावरून (Bridge) पाणी गेल्याने नदीच्या पलीकडे राहणाऱ्या पिंपळद गावातील ग्रामस्थांचा (villagers) देखील गावाशी संपर्क तुटला असून गावची स्मशानभूमी देखील पाण्याखाली गेली आहे.

दरम्यान, या पुलावरून पाणी गेल्याने लावणीसाठी आलेली भात शेती (Rice farming) पाण्याखाली गेली असून काही शेतकऱ्यांचे भात लावणीसाठी खणलेले रोप देखील वाहून गेले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या