नाशिक । प्रतिनिधी Nashik
बिर्हाड आंदोलनात दिलेले नाशिक जिल्हा बँकेचे आश्वासन सरकार पूर्ण करेल. शेतकर्यांना कर्जमुक्त करण्यासाठी नवीन योजना देणार, असे आश्वासन मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी माजी खासदार राजू शेट्टी व संदीप जगताप यांना दिले.
सह्याद्री अतिथी गृहावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी, प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप, जालंदर पाटील व इतर स्वाभिमानीच्या शिष्टमंडळासोबत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांची एक तास राज्यातील विविध शेतकरी विषयावर बैठक पार पडली. या बैठकीमध्ये द्राक्ष बेदाणा, एकरकमी एफ आर पी , नियमित कर्ज भरणार्या शेतकर्यांना अनुदान , नाशिक जिल्हा बँक , पिक विमा व नुकसानग्रस्त पिकांची भरपाई या विषयावरती सखोल चर्चा झाली.
‘बिपरजॉय’चा तडाखा; सौराष्ट्र-कच्छला धडकले
या बैठकीमध्ये राजू शेट्टी यांनी नाशिक जिल्हा बँकेचा विषय अतिशय अभ्यासपूर्ण मांडला. 62 हजार शेतकर्यांच्या जमिनी वाचवायच्या असतील तर या बँकेला आठशे ते हजार कोटी रुपयांचे विशेष पॅकेज सरकारने तात्काळ दिले पाहिजे. त्यासाठी आर्थिक तरतूद केली पाहिजे. किंवा राज्य बँकेला शासनाने हमी देऊन बँकेला दीर्घकालीन कर्ज देऊन शेतकर्यांना ओटीएस दिले पाहिजे. अशी मागणी या बैठकीमध्ये केली. त्यासाठीचा संपूर्ण आकडेवारीचा हिशोब राजू शेट्टी व संदीप जगताप यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या समोर मांडला.
नाशिक जिल्हा बँक वाचवणे ही आमची जबाबदारी आहे. आणि आम्ही तत्काळ या विषयावरती निर्णय घेऊ. बिर्हाड आंदोलनात दिलेले आश्वासन आम्ही पूर्ण करू.असा शब्द यावेळेस उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वाभिमानीच्या शिष्टमंडळाला दिला.यावेळी या बैठकीला सावकार मदनाईक, राजेंद्र गड्ड्यांवर, रवींद्र मोरे, प्रशांत डिक्कर, महेश खराडे, वैभव कांबळे, संदीप राजोबा, एड. संदे यासह स्वाभिमानीचे पदाधिकारी उपस्थित होते.
दुकान निरीक्षक ‘एसीबी’च्या जाळ्यात
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यासोबत झालेल्या बैठकीत नाशिक जिल्हा बँकेचा विषय राजू शेट्टी यांनी अतिशय ताकदीने मांडला. सहा महिन्यांपूर्वी बिर्हाड आंदोलनाला शासनाने दिलेला शब्द याची आठवण करून दिली. व तो न पाळल्यामुळे जनतेत कसा असंतोष आहे, हे सरकारला समजून सांगितले. म्हणून आज मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी बिर्हाड आंदोलनात दिलेला शब्द आम्ही पाळू, असे आश्वासन आम्हाला दिले. या सरकारने हा शब्द पाळवा. ही आम्हाला अपेक्षा आहे.
– संदीप जगताप, प्रदेशाध्यक्ष , स्वाभिमानी शेतकरी संघटना