Thursday, May 15, 2025
Homeदेश विदेशमुलींचं लग्नाचं वय वाढणार, सरकारने घेतला ‘हा’ निर्णय

मुलींचं लग्नाचं वय वाढणार, सरकारने घेतला ‘हा’ निर्णय

सार्वमत

- Advertisement -

नवी दिल्ली – मुलींचे लग्नाचे वय आता 18 वरून 21 वर्ष होण्याची शक्यता आहे. यासंबंधी निर्णय घेण्यासाठी वरिष्ठ नेता जया जेटली यांच्या नेतृत्वात सरकारनं एका समितीची स्थापना केली आहे. सध्या मुलींच्या विवाहासाठी किमान वय 18 वर्षे आणि मुलांसाठी 21 वर्षे निश्चित करण्यात आलं आहे. पण आता त्यात बदल होण्याची शक्यता आहे.

या समितीचे मुख्य कार्य स्त्रिया आणि त्यांच्या मुलांच्या आरोग्याचा अभ्यास करून विवाहचे योग्य वय आणि मातृत्व याचा आढावा घेणं आहे. समिती 31 जूलैला आपला अहवाल सादर करेल. या समितीमध्ये एनआयटीआय आयोगाचे सदस्य डॉ. व्ही.के. पॉल, नजमा अख्तर (सचिव – उच्च शिक्षण सचिव, शालेय शिक्षण, आरोग्य, महिला व बाल विकास), वसुधा कामत आणि दीप्ती शाह यांचा समावेश आहे.

दरम्यान अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी याआधी एका भाषणात याविषयी उल्लेख केला होता. त्या म्हणाल्या होत्या की, आई होण्यासाठी योग्य वयाबद्दल महिलांना सल्ला देण्यासाठी एक समिती तयार करण्यात येईल. सरकारच्या या निर्णयामागे सर्वोच्च न्यायालयाचा एक निर्णय आहे.

ऑक्टोबर 2017 मध्ये सर्वोच्च न्यायालयानं घेतलेला निर्णय सरकारच्या या निर्णयाला कारणीभूत आहे. सर्वोच्च न्यायालयाने लग्नासाठी किमान वय निश्चित करण्याचा निर्णय सरकारवर सोडला होता. त्यामुळे आता समितीच्यान निर्णयानंतर मुलींच्या लग्नाच्या वयात बदल होऊ शकतो. जर लग्नाच्या वयात बदल झाला तर आपोआपच मुलीचे आई होण्याचे वयातही बदल होईल.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

आग

Lucknow: लखनौत अग्नितांडव! चालत्या बसला भीषण आग; ५ प्रवाशांचा होरपळून मृत्यू,...

0
लखनौ | Lucknow उत्तर प्रदेशच्या लखनौमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. गुरुवारी सकाळी किसनपथ परिसरात धावत्या बसने अचानक पेट घेतली. या अपघातात ५ प्रवाशांचा...