Tuesday, April 29, 2025
Homeमुख्य बातम्या"आघाडीचं इंडिया नाव ठेवलं म्हणजे विजय होणार नाही"; श्रीकांत शिंदेंचे टीकास्त्र

“आघाडीचं इंडिया नाव ठेवलं म्हणजे विजय होणार नाही”; श्रीकांत शिंदेंचे टीकास्त्र

नवी दिल्ली | वृत्तसंस्था | New Delhi

विरोधकांना यूपीएची लाज वाटते कारण त्यांना फक्त घोटाळे आठवतात. म्हणून त्यांनी इंडिया हे आघाडीचे नाव ठेवले. काँग्रेसच्या काळात देशात भ्रष्टाचार आणि दहशतवाद फोफावला होता. इंडिया विरोधकांची आघाडी नाही तर विनाशाची आघाडी आहे. अडला हरी गाढवाचे पाय धरी, अशी इंडियाती स्थिती आहे. काँग्रेसच्या भ्रष्टाचाराची सुची A टू Z वाचली तरी कमी पडेल. आघाडीचं इंडिया नाव ठेवलं म्हणजे विजय होणार नाही, अशी टीका खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी विरोधकांवर केली आहे.

- Advertisement -

भाजप नेत्याची काँग्रेससह विरोधी पक्षांवर सडकून टीका, म्हणाले, “तुम करो तो रासलीला, हम करें तो कॅरेक्टर ढिला…”

लोकसभेत केंद्र सरकारवरील अविश्वास ठरावावर चर्चा सुरु आहे. यावेळी खासदार श्रीकांत शिंदे यांनी विरोधकांवर टीका केली. तसेच मणिपूरच्या मुद्द्यावर कॉंग्रेसला धारेवर धरले.

Supriya Sule : “पार्टी विथ डिफरन्स कुठे गेलं? भाजपने ९ वर्षांत…”; सुप्रिया सुळेंचा मोदी सरकारवर हल्लाबोल

खा. डॉ. श्रीकांत शिंदे म्हणाले की, मणिपूरमध्ये जे होत आहे. तो चिंतेचा विषय आहे. यावर गंभीर कारवाई होण्याची शक्यता आहे. ईशान्येकडील सर्व जनता एनडीएसोबत आहे. काँग्रेसच्या काळात मणिपूरकडे लक्ष दिले गेले नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी सत्तेत आल्यानंतर मणिपूरचा विकास सुरू झाला आहे. काँग्रेसच्या काळात मुंबई, पुणे, मालेगाव, हैद्राबादमध्ये बॉम्बस्फोट झाले. तेव्हा कोण गप्प होते, असा प्रश्न श्रीकांत शिंदे यांनी उपस्थित केला.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Ahilyanagar : राजूरमध्ये आरोग्य विभाग अलर्ट मोडवर!

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar अकोले तालुक्यातील राजूर गावात दूषित पाण्यामुळे काविळसह जलजन्य आजारांचा उद्रेक झाला असून या ठिकाणी आरोग्य विभागाकडून 35 पथके तैनात करण्यात आली आहेत....