Friday, April 25, 2025
Homeनगरअहिल्यानगर-सोलापुर महामार्गावर अपघात; दोन युवक ठार

अहिल्यानगर-सोलापुर महामार्गावर अपघात; दोन युवक ठार

कर्जत |प्रतिनिधी| Karjat

अहिल्यानगर-सोलापूर महामार्गावर (Ahilyanagar Solapur Highway) कर्जत (Karjat) तालुक्यातील माहीजळगाव येथे भीषण अपघातात (Accident) परांडा येथील दोन युवक सोमनाथ दत्तात्रय कदम (वय 24) व शिवाजी बबन कदम (वय 35 दोघेही रा. कोकरवाडी ता. परंडा जि. धाराशिव) हे ठार (Death) झाले आहे.

- Advertisement -

सविस्तर माहिती अशी की, आज (मंगळवार) दिनांक 22 ऑक्टोबर रोजी सोमनाथ कदम व शिवाजी कदम हे दोघे कामानिमित्त कोकरवाडी (ता. परंडा) येथून करमाळा मार्गाने मोटारसायकलवरून (क्र. एम एच 45 आर 9718) मिरजगावच्या (Mahijalgav) दिशेने येत असतांना अज्ञात वाहनाने समोरासमोर जोराची धडक (Hit) दिली. या अपघातात सोमनाथ दत्तात्रय कदम यांचा जागीच मृत्यू (Death) झाला. तर शिवाजी बबन कदम यांचा मिरजगाव येथील लोकमान्य हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला.

अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. कर्जत उपविभागीय पोलीस अधिकारी विवेकानंद वाखारे व मिरजगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार दत्तात्रय कासार हे तपास करत आहेत.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

दहशतवाद

Sharad Pawar: “आम्ही दहशतवाद संपवला, आता काही चिंता नाही असे सांगितले...

0
मुंबई | Mumbai पहलगाम बैसरन घाटीमध्ये पर्यटकावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकारने पाकिस्तानला जो संदेश दिला आहे, तो योग्यच आहे. अशा निर्णयात सर्वपक्षीयांनी सरकार सोबत...