Wednesday, April 30, 2025
Homeनगरग्रामपंचायतींसाठी तिसर्‍या दिवशी विक्रमी 820 उमेदवारी अर्ज दाखल

ग्रामपंचायतींसाठी तिसर्‍या दिवशी विक्रमी 820 उमेदवारी अर्ज दाखल

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

जिल्ह्यातील 194 ग्रामपंचायतीच्या सरपंच व सदस्य पदाच्या निवडणुकीसाठी तिसर्‍या दिवशी विक्रमी 820 उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. सरपंच पदासाठी 174 तर सदस्य पदासाठी 646 उमेदवारी अर्जांचा यामध्ये समावेश आहे. दरम्यान, उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत साडेपाचपर्यंत वाढवली असून अर्ज दाखल करण्यासाठी अजून दोन दिवस बाकी असल्याने इच्छुकांची गर्दी होणार आहे.

- Advertisement -

जिल्ह्यातील मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. नामनिर्देशनपत्रे भरण्यासाठी 16 ते 20 ऑक्टोबर मुदत असून दाखल नामनिर्देशनपत्रांची छाननी 23 ऑक्टोबरला होणार आहे. अर्ज दाखल करण्यास सुरूवात झाल्यानंतर सुरूवातीला दोन दिवस अर्ज दाखल करण्याचे प्रमाण कमी होते. सरपंच पदासाठी केवळ तीन तर सदस्य पदासाठी सात अर्ज दाखल झाले होते. अर्ज दाखल करण्याची वेळ साडे पाच वाजेपर्यंत वाढविण्यात आल्याने इच्छुकांना दिलासा मिळाला आहे. त्यामुळे बुधवारी अर्ज दाखल करण्यास जिल्ह्यातील तहसील कार्यालयात गर्दी झाली होती. सरपंच पदासाठी 174 अर्ज तर सदस्य पदासाठी 646 अर्ज दाखल झाले आहेत.

दरम्यान, 82 ठिकाणी पोट निवडणुकीसाठीही निवडणूक जाहीर झाली असून पोटनिवडणूकीच्या सदस्य पदासाठी आठ अर्ज दाखल झाले असल्याचे जिल्हा निवडणूक शाखेकडून सांगण्यात आले.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Sharad Pawar : ठाकरे बंधूंच्या संभाव्य युतीवर शरद पवारांची सूचक प्रतिक्रिया;...

0
मुंबई । Mumbai उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि राज ठाकरे (Raj Thackeray) एकत्र येणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. याबाबत दोन्ही नेत्यांनी सकारात्मक संकेत दिल्याने मनसे-ठाकरे...