Tuesday, April 29, 2025
Homeनगरठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी गडकरींच्या आधीच पुलाचे केले उद्घाटन

ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी गडकरींच्या आधीच पुलाचे केले उद्घाटन

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

नगरचा उड्डाणपूल पूर्णत्वास आल्यानंतर आता त्याचा श्रेयवाद रंगला आहे. भाजपचे खा. डॉ. सुजय विखे पाटील आणि राष्ट्रवादीचे आ. संग्राम जगताप यांनी अलीकडेच पुलाची पहाणी केली. या पुलाचे उद्घाटन 19 नोव्हेंबरला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्याचे जाहीर केले. मात्र, याची माहिती देतांना यासाठी पाठपुरावा करणारे माजी खासदार दिलीप गांधी आणि माजी आमदार अनिल राठोड यांना योग्य ते श्रेय दिला नसल्याचा आरोप शिवसेना उद्धव ठाकरे गटाने केला. त्यामुळे गुरूवारी नियोजित तारखेआधीच शिवसेना तसेच रथोडव गांधी समर्थकांनी पुलाचे उद्घाटन केल्याचं जाहीर केलं.

- Advertisement -

शहरातील तयार झालेल्या बहुचर्चित उड्डाणपुलाची शिवसेनेच्या पदाधिकार्‍यांनी पाहणी करुन औपचारिकरित्या नारळ फोडून उद्घाटन झाल्याचे जाहीर केले. याप्रसंगी शिवसेना शहरप्रमुख संभाजी कदम, युवा सेना राज्यसहसचिव विक्रम राठोड, उपजिल्हाप्रमुख गिरिष जाधव, माजी महापौर सुरेखा कदम, नगरसेवक बाळासाहेब बोराटे, अशोक बडे, दत्ता कावरे, विजय पठारे, संतोष गेनप्पा, अमोल येवले, संग्राम कोतकर, अशोक दहिफळे, बबलू शिंदे, परेश लोखंडे, पारुनाथ ढोकळे, प्रशांत गायकवाड, दिपक खैरे, श्रीकांत चेमटे, शरद कोके, संदिप दातरंगे, अरुणा गोयल आदिंसह शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी कदम म्हणाले, नगरमध्ये उड्डाणपुल व्हावा, यासाठी माजी आ. राठोड व माजी खा. गांधी यांनी वेळोवेळी पाठपुरावा केला. यासाठी दिवंगत राठोड यांनी शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांना मुंबईत तर खा.दिलीप गांधी यांनी दिल्लीतून पाठपुरावा केला. अनेक अडथळ्याची शर्यत पार करत अखेर या पुलाचे काम सुरू झाले. परंतु ज्यांच्या प्रयत्नांनी खर्‍या अर्थाने हा उड्डाणपूल झाला, ते दोन्ही जनतेतील नेते दिवंगत राठोड व गांधी हयात नाहीत. परंतु खर्या अर्थाने ज्यांचे योगदान यासाठी आहे, त्यांचा सोयीस्कर विसर पडला आहे. त्यामुळे आम्ही शिवसैनिकांनीच या पुलाचे उद्घाटन करुन त्यांच्या कार्याची जाणिव सर्वांना करुन देण्याचा प्रयत्न केला असल्याचे सांगितले.

याप्रसंगी राठोड म्हणाले, राज्यात अनेक जिल्ह्यात उड्डाणपूल होत असताना नगरमध्येही पूल व्हावा, यासाठी राठोड यांनी मोठे प्रयत्न केले. ज्यावेळी राज्यात शिवसेना- भाजपची सत्ता होती, त्यावेळी नगरमध्ये आलेल्या मंत्र्यांना नगरमध्ये उड्डाणपूल होणे किती गरजेचे आहे, हे वेळोवेळी सांगून मुंबईतही त्यासाठी प्रयत्न केले. त्याचबरोबर दिवंगत गांधी यांचेही मोठे योगदान राहिले, परंतु आता त्यांचा सध्या विसर पडला आहे. त्यामुळे आम्ही औपचारिक उद्घाटन केलं आहे, लवकरच हा पूल नागरिकांसाठी खुला होईल, असे सांगितले.

दरम्यान, यावेळी राठोड व गांधी यांचे फोटो असलेले फलक झळकावत मोठ-मोठ्या घोषणा देत कार्यकत्यांनी पुलावरील वातावरण दणाणून सोडले. यावेळी मोठा पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला होता. शिवसेनेच्या वतीने पुलाची पाहणी होणार असल्याचे सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने पुलावर ठिकठिकाणी मोठ-मोठे गल्डर टाकून रस्ता बंद करण्यात आला होता.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Crime News : एमआयडीसीतील कंपनीतून सव्वा दोन लाखांच्या स्क्रॅपची चोरी

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar एमआयडीसीतील मिस्त्री ऑटो इंजिनिअर प्रा. लि. कंपनीतून तब्बल दोन लाख 20 हजार रुपये किमतीचे 2.5 टन वजनाचे लोखंडी शीट व स्क्रॅपचे तुकडे...