Saturday, May 4, 2024
Homeमुख्य बातम्याजनता वाऱ्यावर अन् मुख्यमंत्री सत्कार समारंभात; अजितदादांचा हल्लाबोल

जनता वाऱ्यावर अन् मुख्यमंत्री सत्कार समारंभात; अजितदादांचा हल्लाबोल

मुंबई | Mumbai

महाराष्ट्रात दोघांचे सरकार (Government) आहे. एक महिना उलटला तरीदेखील अद्याप मंत्रीमंडळ विस्तार झालेला नाही. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गावोगावी सत्कार स्वीकारत आहेत. यापेक्षा राज्यातील समस्या त्यांनी सोडवल्या पाहिजे. जनता सध्या वाऱ्यावर असल्याची परिस्थिती असल्याची टीका विरोधी पक्ष नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी केली आहे…..

- Advertisement -

पत्राचाळ प्रकरणात संबित पात्रांची उडी, आकडेवारी जाहीर केल्याने खळबळ

ते म्हणाले की, राज्यात प्रामुख्याने विदर्भात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. मात्र, अद्यापपर्यंत राज्य सरकारकडून (State Government) नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळाली नाही. अनेक शेतकऱ्यांचे संसार उघड्यावर आले आहेत.

राज्यात पुन्हा मुसळधार; ऑगस्ट-सप्टेंबरचा अंदाज हवामान विभागाकडून सादर

राज्यातील जनता त्रस्त असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे सत्कार सभारंभात व्यस्त असून, त्यांनी हे सत्कार समारंभात सहभागी होण्याऐवजी कारभार व्यवस्थित चालवा, असा सल्ला त्यांनी मुख्यमंत्र्यांना दिला आहे.

कांदा रडवणार! शेतकऱ्यांकडून कांदा विक्री बंदचा इशारा

उपमुख्यमंत्री देवेद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याकडे कोणतेही खाते, चार्ज नाही. मुख्यमंत्री यांच्याकडे 42 मंत्र्यांची खाती एकट्याकडे आहेत. तर ते वेळ कसे देणार? असा सवाल अजित पवार (Ajit Pawar) यांनी उपस्थित केला.

घरांचा प्रश्न सोडवण्यासाठी निफाड पॅटर्नची चर्चा

- Advertisment -

ताज्या बातम्या