Tuesday, March 11, 2025
Homeब्रेकिंग न्यूजAjit Pawar: गृहनिर्माण सोसायटीच्या गाळ्यात 'ना हरकत प्रमाणपत्रा'शिवाय बियर किंवा दारुचे दुकान...

Ajit Pawar: गृहनिर्माण सोसायटीच्या गाळ्यात ‘ना हरकत प्रमाणपत्रा’शिवाय बियर किंवा दारुचे दुकान टाकताय? ‘हा’ नवा नियम वाचला का?

मुंबई | Mumbai
राज्यात गृहनिर्माण सोसायट्यांच्या व्यावसायिक गाळ्यात बियर किंवा दारुचे दुकान सुरु करायचे असेल तर यापुढे संबंधित सोसायटीचे ‘ना हरकत प्रमाणपत्र’बंधनकारक राहील. सोसायटीच्या ना हरकत प्रमाणपत्राशिवाय राज्यात नवीन बियर शॉपी किंवा दारु दुकान सुरु करता येणार नाही”, अशी घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत केली.

अजित पवार यांच्या घोषणेमुळे गृहनिर्माण सोसायट्यांमधील वातावरण कलहमुक्त राहण्यास, तरुण पिढी व्यसनाधिनतेकडे वळण्यास प्रतिबंध होणार असून कायदा-सुव्यवस्था सुधारण्यास मदत होणार आहे. महापालिका वार्डमध्ये मद्यविक्रीचे दुकान बंद करायचे असेल नियमानुसार आलेल्या प्रस्तावावर झालेल्या एकूण मतदानापैकी ७५ टक्के मतदान ज्या बाजूने होईल त्या बाजूने निर्णय होईल, असेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले. अजित पवार यांच्या या घोषणेचे समाजाच्या सर्व थरातून स्वागत होत आहे.

- Advertisement -

https://twitter.com/AjitPawarSpeaks/status/1899424239985537029

शासनाची भूमिका दारुविक्री वाढावी नसून दारुबंदी नियमांची काटेकोर अंमलबजावणी करण्याची
राज्यातील गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये बियर आणि दारु दुकानांना परवानगी दिली जात असल्याने कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असल्याचा मुद्दा भाजप आमदार महेश लांडगे आणि आमदार राहूल कूल आदी सदस्यांनी लक्षवेधी सूचनेद्वारे सभागृहात उपस्थित केला होता. माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनीही चर्चेत महत्वाचे मुद्दे उपस्थित केले.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले की, शासनाची भूमिका राज्यात दारुविक्री वाढावी, अशी नसून दारुबंदीच्या नियमांची काटेकोर अंमलबजावणी करण्याची आहे. अनेक दशकांपासून राज्यात दारुविक्रीचे परवाने बंद आहेत. शाळा, महाविद्यालयांच्या परिसरात दारुदुकानांना परवानगी नाही. राज्यात दारुविक्रीला प्रोत्साहन न देता अवैध दारुविक्री रोखण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात येतील, असेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत लक्षवेधी सूचनेवर उत्तर देताना स्पष्ट केले. यासंदर्भत लोकप्रतिनिधी आणि नागरिकांकडून येणाऱ्या प्रत्येक सूचनेचा सकारात्मक विचार केला जाईल”, असे आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सभागृहाला दिले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या रोखठोक आणि स्पष्ट उत्तराचे सुधीर मुनगंटीवार यांच्यासह अनेक सदस्यांनी कौतुक केले.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

पाकिस्तानमध्ये बलोच आर्मीने संपुर्ण ट्रेनच केली हायजॅक; लष्कर, पोलीस, ISI च्या...

0
नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhiपाकिस्तानमधील परिस्थिती दिवसंदिवस गंभीर होत आहे. आता पाकिस्तानमधील बलोच आर्मीने संपूर्ण ट्रेनच हायजॅक केली. दशतवाद्यांनी रेल्वेतील १२० जणांना ओलीस...