Sunday, September 22, 2024
Homeमुख्य बातम्या“लव्ह जिहादच्या नावाखाली समाजात विष पेरण्याच काम...”; अजित पवारांचा हल्लाबोल

“लव्ह जिहादच्या नावाखाली समाजात विष पेरण्याच काम…”; अजित पवारांचा हल्लाबोल

सांगली | Sangali

- Advertisement -

मुंबईत सकल हिंदू समाजाने हिंदू जन आक्रोश मोर्चा काढला आहे. लव्ह जिहाद रोखण्यासाठी कायदा करावा आणि धर्मांतर विरोधी कायद्याची अंमलबजावणी करावी, अशी मागणी या मोर्च्यातून करण्यात आली आहे.

दरम्यान या मोर्च्यावर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी लव्ह जिहादच्या नावाखाली समाजात विष पेरण्याचे काम सुरू आहे, असा निशाणा साधला आहे. सांगली जिल्ह्यातील कासेगाव येथे क्रांतिवीरांगना इंदुमती पाटणकर यांच्या स्मारकाचे उदघाटन अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी ते बोलत होते.

लव्ह जिहादच्या नावाखाली समाजात विष पेरण्याचे काम सुरू आहे. राजकीय पोळी भाजण्यासाठी जाती-जातीत तेढ निर्माण केली जात आहे. मात्र आज जे समाजात सुरू आहे, त्याच्या विरोधात ज्या प्रमाणात उठाव व्हायला पाहिजेल होता. मात्र, तसा होताना दिसत नाही, अशी खंत विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी व्यक्त केली.

क्रांतीविरांगणा इंदूमती पाटणकर यांनी स्वातंत्रलढ्याबरोबरच जाती अंताचा लढा उभा केला. त्याकाळी त्यांनी अनेक आंतरजातीय विवाह लावून दिले होते. आता सुद्धा याच भूमीतील राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या दोन्ही मुलांनी आंतरजातीय विवाह केले आहेत, असं सांगून अजित पवार पुढे म्हणाले, अलीकडे सेक्युलर ह्या शब्दालाच कुठेतरी तिलांजली देण्याचा प्रयत्न काही जण करतात. हे आपल्या भारताच्या दृष्टीने अतिशय अडचणीचं होणार आहे.

दरम्यान यावेळी अजितदादांनी पहाटेच्या शपथविधी वर बोलण टाळाल. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी नंतर एक स्टेटमेंट करून त्याच्यावर पडदा टाकलेला आहे. सारखं सारखं ते उगाळू नका. त्याला तीन वर्षे झालेली आहेत, त्यापेक्षा आपण महागाई बेरोजगारी आत्ताचे जे काही प्रश्न यक्ष प्रश्न निर्माण झालेले त्याच्याबद्दल या मीडियाचाही वापर करून आणि लोकांना जागृत करू, असे म्हणत पहाटेच्या शपथविधीवर बोलणे टाळले.

- Advertisment -

ताज्या बातम्या