Friday, May 16, 2025
Homeनगरअकोलेत काँग्रेसचे लाक्षणिक उपोषण व धरणे आंदोलन

अकोलेत काँग्रेसचे लाक्षणिक उपोषण व धरणे आंदोलन

अकोले |प्रतिनिधी| Akole

- Advertisement -

महाराष्ट्रात अतिवृष्टीत व ढगफुटी सदृश पावसाने सर्वत्रच हाहाकार उडवून थैमान घालून तो खरीप पिकांसह शेतकरी व नागरिकांच्या समस्यांत वाढ करून प्रचंड नुकसानीस कारणीभूत ठरलाय. हे या सरकारला माहीत असताना देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बघ्याचीच भूमिका घेत आहेत. दिलासा देण्यास या सरकारकडून ओला दुष्काळ जाहीर करण्यात येत नाही.

याबरोबरच महाविकास सरकारकडून मंजूर विकास कामांवरील तरतुदीस स्थगिती देण्यात आली आहे. राजकीय द्वेषातून अकोले तालुक्यातील मंजूर विकास कामांना स्थगिती दिली आहे. अकोले तहसील कार्यालयासमोरील लाक्षणिक उपोषण व धरणे आंदोलनात या सर्व बाबींचा तीव्र शब्दांत संताप व्यक्त करत जाहीर निषेध करण्यात आला.

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारकडून विकास कामांना स्थगिती देण्यात आली ती राजकीय आकसातून व अन्यायकारक असून ती स्थगिती तत्काळ उठवावी व मंजूर विकास कामे तातडीने सुरू करावीत. अतिवृष्टीत राज्यातील शेतकरी व शेती संकटात आली असून पुरती उद्ध्वस्त झाल्याने ओला दुष्काळ जाहीर करावा व सरकारने आठ अ नुसार शेतकर्‍यांना सरसकट 50 हजार रुपयांचे एकरी अनुदान द्यावे, या मागण्यांसाठी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाकडून अकोले तहसील कार्यालयासमोर सकाळी 11 वाजल्यापासून लाक्षणिक उपोषण व धरणे आंदोलन करण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार डॉ. किरण लहामटे व ज्येष्ठ नेते अगस्ति कारखान्याचे व्हा. चेअरमन अशोकराव भांगरे यांनी धरणे आंदोलनात स्वतः उपस्थित होऊन आंदोलनास जाहीर पाठिंबा दिला.

लाक्षणिक उपोषण व धरणे आंदोलनात राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष दादापाटील वाकचौरे, ज्येष्ठ नेते व जिल्हा बँकेचे संचालक मधुकरराव नवले, अगस्तिचे संचालक मीनानाथ पांडे, पाटीलबा सावंत, जिल्हा उपाध्यक्ष शिवाजी नेहे, तालुका सचिव संपत कानवडे, ज्येष्ठ नेते सोन्याबापू वाकचौरे, रमेश जगताप, शंकरराव वाळुंज, मदन आंबरे, अ‍ॅड. के. बी. हांडे, भास्कर दराडे, मंदाबाई नवले, विक्रम नवले, संभाजी वाकचौरे, रजनीकांत भांगरे, साईनाथ नवले, दशरथ जाधव, रामदास धुमाळ, रमेश जगताप, सुजीत नवले, रामदास शेटे, माजी सरपंच सुमनबाई जाधव, शंकर गोर्डे, सचिन जगताप, बाळासाहेब गोर्डे, शिवाजी आरोटे, सुरेश नवले, सखाराम खतोडे आदींसह तालुक्यातील पदाधिकार्‍यांसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. प्रास्ताविक ज्येष्ठ विधिज्ञ के. बी. हांडे यांनी केले . सूत्रसंचालन शिवाजी नेहे यांनी केले.

यावेळी राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते मधुकरराव नवले, मीनानाथ पांडे, किसान सभेचे जिल्हाध्यक्ष विक्रम नवले, ‘अगस्ति’चे संचालक पाटीलबा सावंत, संगमनेर साखर कारखान्याचे संचालक संभाजी वाकचौरे, भास्कर दराडे यांची अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांच्या शेतातील खराब झालेल्या खरीप पिकांना सरसकट नुकसान भरपाईच्या मागणीवर शिंदे फडणवीस सरकारचा समाचार घेत तडाखेबंद भाषणे झाली. तालुकाध्यक्ष दादापाटील वाकचौरे यांनी आंदोलनातील मागण्यांचा पुनरुच्चार करीत भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो पद यात्रेत सहभागी होण्यासाठी अकोल्यातून तालुका काँग्रेस पदाधिकार्‍यांसह शेकडो कार्यकर्ते जाणार असल्याचे स्पष्ट केले. यावेळी आंदोलकांकडून मागण्यांचे निवेदन तहसीलदार सतीश थेटे यांनी स्विकारले.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

राजनाथ

Rajanath Singh: ‘कागज का है लिबास चरागों का शहर है, संभल-संभल...

0
नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi ऑपरेशन सिंदूरनंतर भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह शुक्रवारी भुज एअरबेसवर पोहोचले. त्यांनी जवानांची भेट घेत त्यांचे भरभरून कौतुक केले....