Saturday, June 7, 2025
Homeब्रेकिंग न्यूजAmit Thackeray: ठाकरे बंधुंच्या युतीवर अमित ठाकरेंचे महत्वाचे भाष्य, "त्यांच्याकडे एकमेकांचे नंबर...

Amit Thackeray: ठाकरे बंधुंच्या युतीवर अमित ठाकरेंचे महत्वाचे भाष्य, “त्यांच्याकडे एकमेकांचे नंबर आहे, ते बोलू शकता”…

मुंबई | Mumbai
राज्याच्या राजकीय वर्तुळात मागील काही दिवसांपासून उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि राज ठाकरे यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्यामध्ये युती होणार असल्याच्या जोरदार चर्चा सुरु होत्या. या चर्चांवर आता अमित ठाकरेंनी मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेना युतीवरही भाष्य केले आहे. “दोन भावांनी बोलले पाहिजे. त्यांच्याकडे एकमेकांचे नंबर आहेत, ते बोलू शकतात” अशी प्रतिक्रिया दिली आहे.

नेमके काय म्हणाले अमित ठाकरे?
मनसे शिवसेना युतीबाबत माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना अमित ठाकरे म्हणाले, दोन्ही भाऊ एकत्र आले तर मला काही प्रॉब्लेम नाही. मात्र त्यांची (राज ठाकरे आणि उध्दव ठाकरे) इच्छा असेल तर त्यांनी फोन करावा. दोघांकडे एकमेकांचा नंबर आहे. आम्ही बोलून काही फरक पडणार नाही. दोन्ही भाऊ एकत्र आले तर काही प्रॉब्लेम नाही. मात्र त्याची इच्छा असेल तर त्यांनी एकमेकांना फोन करावा. दोघांकडे एकमेकांचा नंबर आहे. दोन भावांनी एकत्र यावे हे त्यांनी ठरवावे. राज ठाकरे यांची इच्छा असेल ती माझी इच्छा. पुढाकार कोणी घ्यावा हे त्यांनी ठरवावे, आम्ही बोलून काही उपयोग नाही, असेही पुढे अमित ठाकरे यांनी म्हटले आहे.

- Advertisement -

मी या घडामोडीकडे लक्ष देत नाही. पण, राज ठाकरे आणि उद्धवजी बोलले तर होईल. आम्ही खालची लोक बोलून अर्थ नाही, मला कोणालाही मूर्ख बनवायचे नाही आहे. आम्ही याआधी संवाद साधला आहे, आता दोघांकडे फोन आहे त्यांनी बोलले पाहिजे. आम्ही २०१४-१७ मध्ये प्रस्ताव दिला होता, तेव्हा काय झाले शेवटच्या क्षणापर्यंत आम्ही थांबलो होतो. आता त्यांनी इच्छा व्यक्त केली आहे तर पुढे यावे. आम्हाला एकत्र येण्यावर काहीही इशू नाही, असेही पुढे अमित ठाकरे म्हणालेत.

काल आदित्य ठाकरे यांचे युतीबाबतचे सकारात्मक वक्तव्यसमोर आला होते. त्यानंतर आज अमित ठाकरे यांनी देखील युतीबाबत वक्तव्य केले आहे. दोन्ही भावांनी एकमेकांशी याबाबत बोलले पाहिजे, असे आमित ठाकरे म्हणालेत. महानगरपालिका निवडणुकीच्या आणि स्थानिक स्वराज्य निवडणुका यांच्या पार्श्वभूमीवर ठाकरे बंधू एकत्र आले तर राज्याच्या राजकारणात एक वेगळे समीकरण पाहायला मिळेल. दोन भावांची इच्छा असेल तर त्या दोघांनी बोलावे एकमेकांना फोन करावा. माध्यमांसमोर बोलून काही फरक पडणार नाही आणि तशी युती देखील होत नाही, त्यांच्याकडे एकमेकांचे नंबर आहेत. ते बोलू शकतात ते दोघे भाऊ आहेत असेही अमित ठाकरे म्हणाले आहेत.

आदित्य ठाकरे काय म्हणाले होते?
मनसे आणि ठाकरे गटाच्या युतीबाबत राजकीय वर्तुळात अनेक तर्क लढवले जात असतानाच उद्धवसेनेचे नेते आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी सूचक विधान केले आहे. “आम्ही आमच्याकडून प्रतिसाद दिला आहे. आमची भावना व्यक्त केली आहे. मराठी माणूस व महाराष्ट्राच्या हितासाठी जो कोणी आमच्यासोबत यायला तयार असेल, त्यांना आम्ही बरोबर घेऊन महाराष्ट्र हितासाठी लढत राहू. अलिकडेच आमचे नेते दीपेश म्हात्रे व मनसेचे नेते राजू पाटील यांनी एकत्र येऊन आंदोलन केले. हे त्याचेच उदाहरण आहे. लोकांच्या मनात काय आहे हे आम्हाला माहिती आहे आणि आमचे मन साफ आहे. जो कोणी नेता महाराष्ट्र हितासाठी आमच्याबरोबर यायला तयार असेल, जो पक्ष पुढे येत असेल, आम्ही त्यांच्याबरोबर एकत्र येऊन लढू” असे आदित्य ठाकरे यांनी स्पष्ट केले.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

YouTube video player

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Corona Virus : सावधान! करोना वाढवतोय टेन्शन; भारतात रुग्णांची संख्या ५०००...

0
दिल्ली । Delhi भारतात पुन्हा एकदा कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होत असल्याने चिंता व्यक्त होत आहे. शुक्रवारी (६ जून) देशभरात ५,००० हून अधिक सक्रिय रुग्णांची नोंद...