Thursday, January 8, 2026
Homeजळगावअनिल पाटलांच्या प्रयत्नाने सात्री गावाच्या भूसंपादनास मिळाली गती-श्री.बोरसे

अनिल पाटलांच्या प्रयत्नाने सात्री गावाच्या भूसंपादनास मिळाली गती-श्री.बोरसे

अमळनेर । प्रतिनिधी

मतदारसंघाचे भूमिपुत्र आमदार तथा राज्याचे पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी सुरवातीपासूनच सात्री गावाच्या पुर्नवसनाला गती देण्यासाठी यशस्वी प्रयत्न केले असुन त्यांच्या प्रयत्नानेच सात्री गावाच्या गृहसंपादन व भूसंपादन प्रक्रियेस गती मिळाली आहे, बाधित शेतकर्‍यांना भूसंपदानाचा मोबदलाही मिळाला आहे आणि पुनर्वसन प्रक्रियेसाठी कालावधी जाणार म्हणुन गावकर्‍यांना पर्यायी रस्त्यासाठी साडेचार कोटी निधीस मंजुरी देखील मिळाली असल्याची माहिती सरपंच तथा सरपंच संघटनेचे तालुकाध्यक्ष महेंद्र बोरसे यांनी दिली.

- Advertisement -

एवढेच नव्हे तर निम्न तापी प्रकल्पात बाधित ठरणार्‍या अमळनेर तालुक्यातील 12 गावांच्या भूसंपादनालाही पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी गती दिली असल्याचे बोरसे यांनी सांगितले.पुनर्वसन खाते त्यांच्याकडे असल्यानेच लाभ झाला असताना मात्र विरोधी उमेदवार असलेल्या माजी आमदार शिरीष चौधरी व त्यांचे बंधु डॉ रविंद्र चौधरी यांना निम्न तापी प्रकल्प पाडळसरे धरण आणि पुनर्वसन प्रक्रिया याबद्दल काहीच ज्ञान नसल्यानें ते उलटसुलट आरोप मंत्री महोदय यांच्यावर करीत असल्याचा टोला ही त्यांनी लगावला आहे. मंत्री अनिल पाटील यांच्या प्रयत्नाने सात्रीच्या गृह संपादन कामाला गती मिळावी म्हणून 3 कोटी 12 लक्ष,26 हजार 559 एवढा निधी जानेवारी 2024 मध्ये पैसे उपलब्ध झाले आहेत. त्याचबरोबर पुनर्वसन साठी तांत्रिक कालावधी जाणार त्या कालावधीत सात्री गावकर्‍यांना पावसाळ्यात बोरी नदीच्या अडचणीमुळे पर्यायी रस्ता उपलब्ध करण्यासाठी 4 कोटी 55 लक्ष 39 हजार किमतीच्या पावणे पाच कि.मी.रस्त्याला मंजूरी मिळवली असून त्याची निविदा देखील प्रसिद्ध झाली आहे. तसेच यापूर्वी निम्न तापी प्रकल्पाच्या बुडिताखाली येत असलेल्या सात्री येथील शेतकरी बांधवांच्या शेत जमिनी संपादन देखील करण्यात आल्या असून संबंधित बाधीत शेतकरी बांधवाना 3 कोटी 28 लक्ष एवढा भूसंपादन मोबदला देखील अदा करण्यात आला आहे.म्हणजेच मंत्री अनिल पाटील हे आमच्या गावाला न्याय देण्यात कुठेही कमी पडलेले नाहीत हे स्पष्ट आहे.

YouTube video player

12 गावांच्या भूसंपादनालाही दिली गती
मंत्री अनिल पाटील यांनी सात्रीच नव्हे तर तालुक्यातील धरणाच्या बुडीत क्षेत्रात येणार्‍या 12 गावांच्या भूसंपादन प्रस्तावास देखील गती देण्याचा यशस्वी प्रयत्न केला असून यासाठी प्रत्यक्षात 2 कोटी, 33 लक्ष 13 हजार 616 रुपये एवढा निधी देखील भूसंपादन कार्यालयात जमा करण्यात आला आहे. तालुक्यातील कामतवाडी, मुंगसे, सावखेडा, मठगव्हाण, दोधवत, दापोरी खुर्द, धावडे, नालखेडा, गंगापूरी, रुंधाटी, खापरखेडा प्रगणे जळोद आणि निंभोरा आदी गावांचा यात समावेश असल्याचे बोरसे यांनी सांगितले. पाडळसरे धरण आणि या प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रात येणार्‍या गावांचे पुनर्वसन हा अतिशय मोठा प्रश्न असताना मंत्री अनिल पाटील हे अभ्यासु आणि क्रियाशील व्यक्तीमत्व असल्यामुळेच दोन्ही कामांना गती मिळाली आहे.

ताज्या बातम्या

संपादकीय : ८ जानेवारी २०२६ – शहाणे होण्याची गरज

0
जनतेला आता राजकारण्यांची, नेत्यांची कमाल वाटायला लागली असेल. चेहर्‍यावर सोयीनुसार वेगवेगळे मुखवटे चढवायचे. तोच खरा चेहरा असल्याचे भासवायचे. गरज पडली तर मुखवट्याचे रंगही बदलायचे....