Saturday, April 26, 2025
Homeनगरमाझ्यामुळे त्यांचे 12 मंत्री घरी गेले, यांना बारा वर्षांनी जाग आली

माझ्यामुळे त्यांचे 12 मंत्री घरी गेले, यांना बारा वर्षांनी जाग आली

अण्णा हजारे यांचे पवारांना प्रत्युत्तर

पारनेर |तालुका प्रतिनिधी| Parner

आता 12 वर्षांनी यांना जाग आली का? माझ्यामुळे त्यांचे अनेक मंत्री घरी गेले आहेत, अशा शब्दांत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारें यांनी शरद पवार यांना प्रत्युत्तर दिले आहे. काही वर्षांपूर्वी अण्णा हजारे आणि बीएमसीचे माजी अधिकारी जी. आर. खैरनार यांनी माझ्यावर गंभीर आरोप केले होते. मात्र, ते दोघेही आता कुठे दिसत नाही, अशी टीका शरद पवार यांनी अण्णा हजारे यांच्यावर केली होती. दरम्यान, या टीकेला आता अण्णा हजारे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. मंगळवारी माध्यमांशी बोलताना त्यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली.

- Advertisement -

शरद पवार यांना 10-12 वर्षांनी जाग आली आहे. त्यांना अचानक जाग कशी आली मला माहिती नाही. त्यावेळी मी केलेल्या आंदोलनामुळे शरद पवार यांचे अनेक मंत्री घरी गेले होते. तसेच मी शरद पवारांचे नातेवाईक असलेले पद्मसिंह पाटील यांच्याविरोधातही आंदोलन केले होते. कदाचित त्याचा राग त्यांना असावा. म्हणून त्यांनी माझ्यावर टीका केली, असं प्रत्युत्तर अण्णा हजारे यांनी दिलं. त्यांनी जितेंद्र आव्हाड यांनाही टोला लगावला. शरद पवार यांच्या पक्षातील आमदार जितेंद्र आव्हाड यांनीही मध्यंतरी माझ्यावर टीका केली होती.

मात्र, प्रत्येक पक्षात हे समविचारी माणसं असतात, तसेच शरद पवार आणि जितेंद्र आव्हाड हे समविचारी लोक आहेत, ते एकत्र राहणारच, असं अण्णा हजारे म्हणाले.एकंदरितच शरद पवार यांच्या वक्तव्यावर आण्णा हजारे यांनी सडेतोड उत्तर दिले याची सर्वत्र चर्चा आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

लष्कराची मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून...

0
नवी दिल्ली | New Delhi जम्मू-काश्मीरमधील (Jammu and Kashmir) पहलगामजवळ असलेल्या बैसरन खोऱ्यात दहशतावाद्यांनी पर्यटकांच्या हत्या केली. या भ्याड हल्ल्यानंतर (Attack) भारतीय लष्कर आणि सुरक्षा...