Saturday, May 4, 2024
Homeराजकीययेत्या आठ दिवसांत आणखी एका मंत्र्याचा राजीनामा

येत्या आठ दिवसांत आणखी एका मंत्र्याचा राजीनामा

पुणे –

येत्या आठ दिवसांत महाविकास आघाडी सरकारमधील आणखी एक मंत्री राजीनामा देईल असा दावा भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील

- Advertisement -

यांनी केला आहे. भाजपाच्या वर्धापन दिनानिमित्त पुणे येथून व्हर्च्युअल माध्यमातून त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रातील कार्यकर्त्यांना संबोधित केले. यावेळी ते बोलत होते.

ते म्हणाले, मंत्र्यांनी काही केले नाही असे खोटं बोलत आहात. कोर्टाने ठोकले की राजीनामा घेत आहात एक नाही आणि दोन राजीनामे झाले आणि येत्या आठ दिवसांत तिसरा राजीनामा होणार आहे. काल एकाने चांगली कमेंट केली की 36 बॉलमध्ये दोन विकेट आणि उरलेल्या विकेटचे काय. उरलेल्यांची रांगच लागणार आहे. तुमच्या कर्माने तुम्ही मरणार आहात. पण सर्वसामान्यांचे नुकसान करु नका.

दरम्यान, बीड येथील तरुणी पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणी तत्कालीन वनमंत्री संजय राठोड यांच्यावर आरोप झाले होते. भाजपाने हे प्रकरण लावून धरल्यावर गेल्या महिन्यात झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला राठोड यांचा राजीनामा घेण्यात आला होता. यापाठोपाठ 100 कोटींच्या वसुलीबाबत मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या आरोपांच्या सीबीआय चौकशीचा आदेश उच्च न्यायालयाने दिल्याने गृहमंत्री अनिल देशमुख यांना राजीनामा द्यावा लागला आहे. आता येत्या आठ दिवसांत तिसरी विकेट पडेल असा दावा भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.

भाजपा स्वबळावर लढणार2014 मध्ये महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत 122 जागा आपल्याला मिळाल्या. त्यावेळेला आपण एकटे लढून देखील 1 कोटी 47 लाख मते मिळाली. 2019 मध्ये आपल्याला 164 जागा लढण्यासाठी मिळाल्या तरी 1 कोटी 42 लाख मते मिळाली. 100 जागा कमी लढवून देखील जर आपण 1 कोटी 42 लाख मते मिळवू शकतो तर 288 जागा मिळाल्यानंतर दोन कोटींचा टप्पा पार करु शकतो. 2024 मध्ये सगळ्या जागा लढवत स्वबळावर सरकार आणायचे आहे, असे चंद्रकांत पाटील म्हणाले.

- Advertisment -

ताज्या बातम्या