दिल्ली | Delhi
- Advertisement -
आत्मनिर्भर भारत अभियानाच्या धर्तीवर भारत सरकारने महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. देशाचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी भारतातील संरक्षण उत्पादनांची यादी तयार करण्यात आली असून या उत्पादनांच्या आयातीला स्थगिती देण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. त्यांनी टि्वटर द्वारे याची माहिती दिली आहे.
आत्मनिर्भर भारत होण्यामध्ये आणखी एक पाऊल देशाने टाकले आहे. तसेच संरक्षण सामुग्रीसाठी ५२ हजार कोटींच्या गुंतवणूकीचा निर्णयाची घोषणाही यावेळी त्यांनी केली आहे.