दिल्ली | Delhi
- Advertisement -
भारतीय जवानांना त्यांच्या मोबाईलमधून तब्बल ७९ अँप काडून टाकण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यामध्ये प्रसिद्ध फेसबुक, व्हॉट्सअॅप, इंस्टाग्रामतस या प्रसिद्ध अॅप्सचा समावेश आहे. या अॅपसहहित आणखीही काही महत्त्वाच्या अॅप्सचा समावेश आहे.
भारतीय लष्कराची कुठलीही माहिती बाहेर लीक होऊ नये, म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. लष्कराने फेसबुक, टिकटॉक, युसी ब्राऊझर आणि पबजी यांसारख्या प्रसिद्ध अॅप्सच्या वापरावर बंदी आणली आहे. त्याशिवाय टिंडर सारख्या डेटिंग अॅप्सलाही डिलीट करण्यास सांगितलं आहे.
काही दिवसांपूर्वी भारत आणि चीनदरम्यानच्या संघर्षानंतर भारताने चीनच्या ५९ अॅपवर बंदी आणली होती. त्यानंतर आता भारतीय लष्कराने जवानांना आपल्या मोबाईलमधून डेटिंग अॅप डिलीट करण्याचे आदेश दिले आहे.