Sunday, June 8, 2025
Homeनगरतब्बल 73 गोवंश जनावरांची कत्तलीपासून केली सुटका

तब्बल 73 गोवंश जनावरांची कत्तलीपासून केली सुटका

17 गुन्हे दाखल

संगमनेर |प्रतिनिधी| Sangamner

- Advertisement -

राज्यात गोवंश हत्या बंदी असतानाही सर्रासपणे कत्तलखाने सुरूच असल्याचे दिसून येते. संगमनेर शहरातही वारंवार कारवाया करुनही कत्तलखाने सुरूच असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखीत झाले आहे. बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर सहा दिवस शहर पोलिसांनी वेगवेगळ्या ठिकाणी कारवाई करत 73 गोवंश जनावरांची कत्तलीपासून सुटका करत 17 गुन्हे दाखल केले आहे. तर या कारवाईत एकूण 32 लाख 30 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

याबाबत शहर पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, बकरी ईद सणाच्या अनुषंगाने अवैध गोमांसबाबत कारवाईच्या पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी सूचना दिल्या होत्या. त्यानुसार संगमनेर भागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. कुणाल सोनवणे व शहराचे पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक रावसाहेब लोंखडे, समीर अभंग, रमेश पाटील, इम्रान खान, पोकॉ. विशाल कर्पे, हरिश्चंद्र बांडे, आत्माराम पवार, रोहिदास शिरसाठ, अजित कुर्‍हे, संतोष बाचकर, उपविभागीय अधिकार्‍यांच्या पथकातील पोना. राहुल डोके, पोकॉ. राहुल सारबंदे व स्थानिक गुन्हे शाखेतील कर्मचार्‍यांनी 2 जनू ते 7 जून, 2025 दरम्यान शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत वेगवेगळ्या परिसरात छापे टाकले.

या कारवाईत 73 गोवंश जनावरांची कत्तलीपासून सुटका करत त्यांना सायखिंडी येथील जीवदया गोशाळेत पाठविले. याप्रकरणी सतरा गुन्हे दाखल करुन 32 लाख 30 हजार रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे. या कारवाईने अवैध कत्तलखाने चालकांत एकच खळबळ उडाली आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Ahilyanagar : ठाकरे व पवार यांच्या एकत्रिकरणाच्या निव्वळ चर्चा – मंत्री...

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar उध्दव ठाकरे व मनसे तसेच राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र येण्याच्या केवळ चर्चाच सुरू आहेत. या पक्षांचे अधिकृत प्रवक्ते ज्यावेळी यावर स्पष्ट भाष्य...