पाथर्डी |तालुका प्रतिनिधी| Pathardi
तालुक्यातील चिंचपूर इजदे येथील एका बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी दीडलाख रुपये रोख व सोन्या-चांदीचे दागीने असा 2 लाख 46 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना घडली आहे.
याप्रकरणी येथील ज्ञानदेव जनार्धन खेडकर यांनी तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार ज्ञानदेव खेडकर त्यांची पत्नी दोन मुले व सुना असे शेतात गेले होते.दुपारी खेडकर यांचा मुलगा नागनाथ घरी आला असता त्याला घराचे कुलूप तोडलेले दिसले.त्याने वडीलांना फोन करून बोलुन घेतले. घरातील कपाटाची व पेटीची उचकापाचक केलेली दिसली.
घरातील दीडलाख रुपये रोख व सोन्याचे दागीने असा 2 लाख 46 हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेला. 20 ऑगस्ट रोजी ही घटना घडली.दिवसा झालेल्या चोरीमुळे शेतकरी हतबल होत आहे .चिंचपूर इजदे गावातीलच सुभाष खेडकर यांच्या घरीही चोरी झाली आहे.पोलीस निरीक्षक सुहास चव्हाण यांनी घटनास्थळाला भेट दिली आहे.पोलीस पुढील तपास करीत आहेत.