Friday, October 18, 2024
HomeनाशिकNashik News : उमेदवारांनी अर्ज दाखल करताना सुचनांचे पालन करावे - जिल्हाधिकारी...

Nashik News : उमेदवारांनी अर्ज दाखल करताना सुचनांचे पालन करावे – जिल्हाधिकारी शर्मा

नाशिक | प्रतिनिधी
भारतीय निवडणूक आयोगाकडून महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी २२ ऑक्टोबर ते २९ ऑक्टोबर २०२४ या कालावधीत सकाळी ११ ते ३ ही वेळ निश्चित करण्यात आली असून, या निर्धारित वेळेत उमेदवारांनी आपले अर्ज दाखल करताना दिलेल्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी केले आहे.

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांची घोषणा करण्यात आली आहे. त्यानुसार उमेदवारांना जिल्ह्यातील एकूण १५ विधानसभा मतदारसंघांसाठी २२ ऑक्टोबर ते २९ ऑक्टोबर २०२४ या कालावधीत नामनिर्देशन पत्र दाखल करता येणार आहेत. विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवाराची पात्रतेत प्रामुख्याने उमेदवार भारतीय नागरिक असावा, उमेदवाराचे वय २५ वर्षपिक्षा जास्त असावे, उमेदवाराचे नाव महाराष्ट्र विधानसभेच्या मतदार यादीत असणे बंधनकारक आहे. नामनिर्देशन पत्र दाखल करताना उमेदवारांनी नामनिर्देशन पत्राचा ‘२ इ’ नमुना अर्ज भरावयाचा आहे. उमेदवारास निवडणूक निर्णय महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ ची घोषणा अधिकारी यांच्याकडे शपथ, दृढकथन करावे लागेल. शपथपत्र नमुना २६ प्रथम वर्ग दंडाधिकारी, नोटरी यांच्या समक्ष स्वाक्षरी करून सादर करावा. उमेदवाराने मतपत्रिकेवरील फोटोबाबतचे घोषणापत्र सादर करावे. राजकीय पक्षांच्या उमेदवारांनी पक्षाने प्राधिकृत केल्याबाबत विहित सूचनापत्र (एबी फॉर्म) नामनिर्देशनपत्र सादर करण्याच्या अजेच्या दिवशी दुपारी ३ वाजेपूर्वी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे सादर करणे आवश्यक आहे.

- Advertisement -

मतपत्रिकेवर नाव कसे असावे याबाबत उमेदवारांनी लेखी पत्र देण्यात द्यावे. नामनिर्देशनपत्रासोचत जमा करावयाची अनामत रक्कम रुपये १० हजार, अनु. जाती अथवा अनु. जमाती वर्गातील उमेदवारासाठी रुपये ५ हजार ही रोख स्वरुपात जमा करण्यात यावी. एक उमेदवार जास्तीत जास्त चार नामनिर्देशनपत्रे सादर करू शकेल. तसेच एक उमेदवार दोनपेक्षा जास्त मतदारसंघांत अर्ज करू शकणार नाही. उमेदवारास मान्यताप्राप्म राजकीय पक्षाचा असल्यास एक सूचक तर अमान्यताप्राप्त पक्षाचा किंवा अपक्ष असल्यास एकूण १० सूचक आवश्यक असल्याच्या
विधानसभा निवडणुकीत खर्चाची मर्यादा निवडणूक आयोगाने निश्चित करून दिली आहे. त्यानुसार उमेदवारास रुपये ४० लाख इतकी खर्च मर्यादा निश्चित करून देण्यात आली आहे.

उमेदवारांनी निवडणुकीसाठी केलेल्या खर्चाचा हिशेब ठेवायचा असून, उमेदवारांचा खर्चाचा तपशील तपासणीसाठी लोकसभा मतदारसंघनिहाय खर्च निरीक्षक यांची नियुक्ती भारत निवडणूक आयोगाकडून करण्यात येत आहे. त्यांच्याकडे या खर्चाचा अहवाल सादर करावयाचा आहे. नामनिर्देशन पत्र दाखल करणाऱ्या उमेदवारांनी या सर्व बाबींची नोंद घेऊन नामनिर्देशन पत्र निर्धारित वेळेत दाखल करावयाचे असून नामनिर्देशनपत्र दाखल करते वेळी भारत निवडणूक आयोगाकडून देण्यात आलेल्या निर्देशांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी शमां यांनी स्पष्ट केले आहे.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

- Advertisment -

ताज्या बातम्या