Tuesday, June 3, 2025
Homeदेश विदेशCDS Anil Chauhan: "नुकसान महत्वाचे नाही, निकाल महत्वाचा...", सीडीएस अनिल चौहान यांच...

CDS Anil Chauhan: “नुकसान महत्वाचे नाही, निकाल महत्वाचा…”, सीडीएस अनिल चौहान यांच सुचक विधान

पुणे | Pune
भारताचे संरक्षण प्रमुख (सीडीएस) जनरल अनिल चौहान यांनी पुणे विद्यापीठात “भविष्यातील युद्ध आणि युद्धकला” या विषयावर आयोजित केलेल्या भाषणात ऑपरेशन सिंदूरवरील महत्त्वाची माहिती सांगितली. यावेळी त्यांनी आपले काय नुकसान झाले हे महत्वाचे नाही,आपण काय प्रतिकार केला हे महत्त्वाचे असल्याचे म्हटले. सीडीएस अनिल चौहान यांनी ऑपरेशन सिंदूर वेळी भारताचे किती नुकसान यासंदर्भात विचारले जाते, त्यासंदर्भात एक उदाहरण देताना ते म्हणाले की ते महत्त्वाचे नाही. निकाल महत्त्वाचा असून तुम्ही कसा प्रतिसाद देता हे महत्त्वाचे आहे.

- Advertisement -

या ऑपरेशनवरून असे दिसून येते की, युद्ध हे केवळ एक हल्ला नाही, तर राजकारणाचा एक भाग देखील आहे. ऑपरेशन सिंदूरमध्ये युद्ध आणि राजकारण एकाच वेळी चालू असताना आम्हाला एक चांगली काउंटर ड्रोन प्रणाली असल्याचा फायदा झाला, अशी माहिती त्यांनी दिली. ऑपरेशन सिंदूर हे युद्ध रणनीतीचे एक उदाहरण होते, ज्यामध्ये कायनॅटिक आणि नॉन-कायनॅटिक युद्ध कौशल्यांचा वापर केला गेला. या युद्धादरम्यान तीन ट्रेंड उदयास आले, जे भविष्यातील युद्धाची रुपरेषा निश्चित करतील.

सीडीएस अनिल चौहान यांनी आपण भविष्याचा विचार करतो त्यावेळी भूतकाळाकडे पाहावे लागते. भूतकाळाकडून आपण काही शिकत असतो आणि तो पुढे आपल्याला मदत करतो, असे म्हटले. कोणत्याही युद्धात दोन घटक असतात, हिंसा आणि हिंसेमागील राजकारण. राजकीय उद्देश पूर्ण करण्यासाठी हिंसेचा वापर केला जातो. युद्धात चार घटक महत्वाचे असतात. युद्ध लढणारे , ग्राउंड काम करणारे , तंत्रज्ञान , लोकांच्या इमोशन महत्वाच्या असतात त्या खूप मदत करतात, असे अनिल चौहान म्हणाले.

जेव्हा मला विचारले जाते की आपले किती नुकसान झाले, तेव्हा मी म्हणतो ते महत्त्वाचे नाही. निकाल महत्त्वाचा असून तुम्ही कसा प्रतिसाद देता हे महत्त्वाचे आहे. नुकसानासंदर्भात बोलणे योग्य होणार नाही. मात्र, जेव्हा तुम्ही क्रिकेटमध्ये कसोटी मॅच खेळत असता आणि डावानं जिंकता त्यावेळी किती विकेट गेल्या, किती बॉल आणि किती फलंदाज बाद झाले हे महत्त्वाचे नसते. तांत्रिक निकषांनुसार आम्ही यासंदर्भातील विशिष्ट डेटा तुमच्यासोबत शेअर करु, असे अनिल चौहान म्हणाले. आम्ही तुम्हाला सांगू शकतो आमी किती विमाने नष्ट केली, किती रडार नष्ट केले. आम्ही एक ढोबळ परीक्षण करत आहोत लवकरच माहिती देऊ, असे सीडीएस अनिल चौहान म्हणाले.

इमोशन, चान्स आणि कारण या तीन गोष्टी महत्त्वाच्या असतात.या सगळ्या गोष्टी आपल्याला ऑपरेशन सिंदुरमध्ये पाहायला मिळाल्या. पहलगाम मध्ये झालेला हल्ला आपण पहिला. पहलगाममध्ये क्रूरपणा दिसून आला, धर्माच्या नावावर लोकांना मारले गेले. भारत हा कायम दहशत वादाच्या विरोधात आहे. लोकांची भावना होती की बदला घ्या आणि न्याय द्या, असे अनिल चौहान म्हणाले.

सीडीएस चौहान यांनी यावेळी दहशतवादाला आळा घालण्यासाठी पाकिस्तानला स्पष्ट इशारा दिला. तसेच, आजचे युद्ध केवळ पारंपारिक शक्तीच्या वापरापुरते मर्यादित नाही, तर ते विविध राजनैतिक, माहितीपर, लष्करी आणि आर्थिक साधनांद्वारे राजकीय उद्दिष्टे साध्य करण्याची प्रक्रिया देखील असल्याची म्हटले.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Crime News : चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा खून; गळफास घेत नंतर पतीने...

0
पळाशी | प्रतिनिधी | Plashi नांदगाव तालुक्यातील (Nandgaon Taluka) सावरगाव जवळील मन्याड नदीवरील पुलाच्या पुढे व हातगाव तालुका चाळीसगाव शिवारात चारित्र्याच्या संशयावरून (Suspicion of Character)...