मुंबई | Mumbai
राज्यात पूर्णपणे मान्सून (Monsoon) दाखल झाला असला तरी अद्याप राज्यातील काही जिल्ह्यांत पावसाने दडी मारल्याने खरीप हंगामातील (Kharif Season) पेरण्या रखडल्या आहेत. तर काही ठिकाणी शेतकऱ्यांसमोर दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे. मात्र, शुक्रवारपासून पुन्हा एकदा राज्यात पावसाने हजेरी लावल्याने बळीराजा सुखावला आहे…
Shasan Aaplya Dari : “जे घरी बसतात त्यांना जनता…”; मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
त्यानंतर आता हवामान विभागाने पुढील ४८ तासांत किनारपट्टीवर मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविला असून काही जिल्ह्यांना अलर्ट जारी केला आहे. त्यानुसार नाशिक, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, पुणे, ठाणे, पालघर,अहमदनगर, औरंगाबाद, धुळे, नंदुरबार, जळगाव, जालना, परभणी, बुलढाणा, वाशिम, अकोला, अमरावती, यवतमाळ, चंद्रपूर, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची (Heavy Rain) शक्यता आहे.
Shasan Aaplya Dari : नाशिकमध्ये शासन ‘रामदरबारी’ : देवेंद्र फडणवीस
तसेच पुढील तीन दिवसांसाठी राज्यातील काही जिल्ह्यांना यलो अलर्ट (Yellow Alert) जारी करण्यात आला असून १९ ते २२ जुलै दरम्यान चांगला पाऊस (Rain) होईल असा, अंदाज हवामान विभागाने (Meteorological Department) वर्तविला आहे. तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यासह विदर्भातील अनेक जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट (Orange Alert) देण्यात आला आहे.
व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...
Shasan Aaplya Dari : गोदावरीला प्रदूषणमुक्त करणार – अजित पवार