Friday, April 4, 2025
Homeनंदुरबारहोळतर्फे रनाळे येथे बालविवाह रोखला

होळतर्फे रनाळे येथे बालविवाह रोखला

नंदुरबार nandurbar। प्रतिनिधी

होळतर्फे रनाळे येथे होणारा बालविवाह (Child marriage) नंदुरबार तालुका पोलीसांच्या (police) पथकाने रोखला (prevented).

- Advertisement -

दि.18 मे 2023 रोजी नंदुरबार तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राहुल पवार यांना महिला बाल विकास विभागाकडून माहिती मिळाली की, होळतर्फे रनाळे गावात दि.19 मे 2023 रोजी एका अल्पवयीन मुलीचा विवाह होणार असल्याची माहिती मिळाली. त्यांनी पोलीस ठाणे स्तरावरील अक्षता सेलच्या सदस्यांच्या मदतीने तात्काळ माहिती काढली असता, होळ तर्फे रनाळे गावातील एका अल्पवयीन मुलीचा विवाह नगाव ता. अक्कलकुवा येथील तरुणासोबत निश्चित करण्यात आला होता.

पथकाने अल्पवयीन मुलीच्या घरी जावून अल्पवयीन मुलीच्या कुटुंबीयांचे व गावातील नागरिक यांना कायदेशीर बाबी समजावून सांगून त्यांचे समुपदेशन करुन मनपरिवर्तन केले. अल्पवयीन मुलीच्या पालकांना सदरची बाब पटल्याने त्यांनी मुलीचे वय 18 वर्षे पूर्ण झाल्यानंतरच विवाह करणार असल्याची हमी दिली. तसेच अल्पवयीन मुलीच्या पालकांना नंदुरबार तालुका पोलीस ठाण्याकडून कायदेशीर नोटीस देण्यात आली आहे.

नंदुरबार जिल्हा पोलीस दलाकडून राबविण्यात येणार्‍या ऑपरेशन अक्षताचे नंदुरबार पोलीसांचे सर्वत्र कौतूक होत आहे. तसेच ऑपरेशन अक्षता हा उपक्रम यानंतर देखील नंदुरबार जिल्ह्यात प्रभावीपणे राबविण्यात येईल. त्यामुळे जिल्ह्यातील बालविवाहाच्या समस्येचे समूळ उच्चाटन करण्यात यश येईल.

आजपावेतो नंदुरबार जिल्ह्यातील 634 ग्रामपंचायतींपैकी 615 ग्रामपंचायतींमध्ये बालविवाह विरोधी ठराव घेण्यात आले आहेत. तसेच उर्वरीत ग्रामपंचायतींचे ठराव देखील लवकरच घेण्यात येतील. त्याचप्रमाणे आज पावेतो नंदुरबार जिल्हा पोलीसांनी एकुण 17 बालविवाह रोखण्यात पोलीसांना यश आले आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील यांनी दिली.

सदर कामगिरी पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील, अपर पोलीस अधीक्षक निलेश तांबे, उपअधीक्षक सचिन हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली नंदुरबार तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राहुल पवार, महिला बाल विकास विभागाचे संरक्षण अधिकारी गौतम वाघ, समुपदेशक गौरव पाटील, उपनिरीक्षक प्रतीक भिंगार्दे, पोलीस नाईक मनोज ठाकरे, राजेंद्र धनगर यांच्या पथकाने केली.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

‘एमआयडीसी’ असलेल्या गावांना औद्योगिक नगरीचा दर्जा देण्याचे धोरण करावे -मुख्यमंत्री देवेंद्र...

0
मुंबई | प्रतिनिधी Mumbai महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाची (एमआयडीसी) वसाहत असलेल्या गावांना औद्योगिक नगरीचा दर्जा दिल्यास या भागातील विकास करता येईल. त्यामुळे अशा गावांना औद्योगिक...