Thursday, May 15, 2025
Homeभविष्यवेधप्रवाळ रत्न व त्याचे लाभ

प्रवाळ रत्न व त्याचे लाभ

हिंदीमध्ये मूंगा, मराठीत पोवळे इंग्रजीत coral अशी या रत्नाची नावे आहेत. हे खनिज रत्न नसून जलजैविक रत्न आहे. आइसिस नोबाईल्स (Isis Nobiles) या समुद्री किटकांच्या जैविक घरांना प्रवाळ म्हणतात. ही घरे एखाद्या झाडासारखी दिसतात. याच झाडरूपी प्रवाळांना विशिष्ट आकारात कापून ही रत्न बणवले जाते. कॅल्शिअम कार्बोनेट (Calcium carbonate) हा यातील मुख्य रासायनिक घटक आहे. याची काठिण्यता ही 3.5 ते 4 असते. पिवळा, केशरी, लाल, पांढरा व काळा या रंगात ही रत्न संपदा सागर तळाशी असते. त्यातील केशरी व लाल प्रवाळ रत्न म्हणून वापरतात.

- Advertisement -

* रत्नाचे लाभ

1) वारंवार गर्भपात होणार्‍या स्त्रीयांना पोटावर प्रवाळ रत्न घासून लावल्यास गर्भपाताचा धोका टळून सुरक्षित प्रसूती व्हायला मदत होते.

2) लहान मुलांच्या गळ्यात प्रवाळ रत्न बांधले तर खोकला व पोटदुखीचे विकार दूर होतात.

3) लहान मुलांना वारंवार नजर लागते. हे रत्न गळ्यात धारण केल्यास नजर लागत नाही.

4)प्रवाळ भस्म सेवन करून किवा प्रवाळ अंगठी धारण करून मंदाग्नी, पोटदुखी, मिरगीचे प्रकार नष्ट होतात.

5) अंगाला सतत घाम येणे, स्नानानंतर घाम येणे हे विकार या रत्नाच्या वापराने नष्ट होतात.

6) सर्वप्रकारची खाज व चर्मरोग दूर करण्यासाठी प्रवाळभस्म मधातून वापरावे किवा रत्न परिधान करावे. परंतू प्रवाळभस्म मात्र चंद्रपुरी असावे.

7) हे रत्न दीर्घकाळ परिधान केल्यास दम्यावर गुणकारी आहे. बालदमा देखील नष्ट होतो.

8) शारिरीक दुर्बलता, आतड्यातील व्रण, हृदयविकार व रक्तदाब या विकारांवर प्रवाळ रत्न अत्यंत गुणकारी आहे.

9) ज्यांचे डोळे सतत लाल दिसत असतील तर प्रवाळभस्म मधातून किवा दुधातून घ्यावे उत्तम लाभ होतात. डोळ्यांची लाली मात्र मद्याची असू नये.

10) मुळव्याधीच्या विकारांवर प्रवाळ भस्म व रत्न अत्यंत गुणकारी आहे.

* कुंडलीनुसार कोण वापरू शकतो प्रवाळ..?

मेष , कर्क , सिंह , वृश्चिक , धनू , मकर , मीन या लग्न असलेल्या जातकांनी हे रत्न परिधान करावे. मंगळ अस्तंगत, शत्रू ग्रहासोबत किवा वक्री असेल तर…. मंगळ षष्ठेश वा अष्टमेश असून शुभस्थानात पडला असेल तर…. मंगळ लग्नी असून त्यावर गुरूची दृष्टी असेल तर…. मंगळ चार , आठ , बारा या भावात असेल तर….चंद्र मंगळ युती पत्रिकेत कोणत्याही स्थानी असेल तर…. या सर्व अवस्थांमध्ये हे रत्न तज्ज्ञांच्या सल्ल्याने वापरावे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Rajnath Singh : “धर्म विचारून त्यांनी निरपराधांचा बळी घेतला, आपण कर्म...

0
नवी दिल्ली | New Delhi  जम्मू-काश्मीरच्या (Jammu-Kashmir) पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात २६ भारतीय पर्यटकांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर (Operation Sindoor) राबवत पाकिस्तानमधील...