Saturday, May 4, 2024
Homeमहाराष्ट्रराज्यात आतापर्यंत ‘इतके’ करोना बळी

राज्यात आतापर्यंत ‘इतके’ करोना बळी

मुंबई –

राज्यात करोना मृत्यूंचे प्रमाण वाढतच चालले आहे. गुरुवारी आणखी 459 करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून राज्यात आतापर्यंत

- Advertisement -

या संसर्गाने 34 हजार 345 जणांचा बळी घेतला आहे. राज्यातील करोना मृत्यूदर सध्या 2.68 टक्के इतका आहे. तर गुरुवारी राज्यात 19 हजार 164 नवे करोना रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत.

या रुग्णसंख्येमुळे सध्याच्या घडीला महाराष्ट्रातील क++++रोना रुग्णांची एकूण संख्या 12 लाख 82 हजार 963 इतकी झाली आहे. तसेच गुरुवारी 17 हजार 184 रुग्ण बरे झाले आहेत.

आतापर्यंत महाराष्ट्रात 9 लाख 73 हजार 214 रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. तर सध्याच्या घडीला महाराष्ट्रात 2 लाख 74 हजार 993 अ‍ॅक्टिव्ह केसेस आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या