मुंबई / Mumbai – राज्यात आज उपचारानंतर बरे झालेल्या 4 हजार 110 जणांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे तर 6 हजार 479 नवे करोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. याशिवाय राज्यात आज 157 करोनाबाधित रूग्णांच्या मृत्यूची देखील नोंद झाली आहे.
राज्यात आतापर्यंत एकूण 60,94,896 करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) 96.59 टक्के इतके झाले आहे. आता राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या 63,10,194 झाली आहे. तर, राज्यात आजपर्यंत 13298 करोनाबाधितांचा मृत्यू झालेला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 2.1 टक्के इतका आहे.
आतापर्यंत तपासण्यात आलेल्या 4,81,85,350 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 63,10,194 (13.1 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 4,67,986 व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर 3,117 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात सध्या एकूण 78,962 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.