मुंबई – राज्यात आज 34 हजार 31 नवे करोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत तर 51 हजार 457 रुग्णांनी करोनावर मात केल्याने त्यांना घरी सोडण्यात आलं आहे. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचं प्रमाण हे 91.06 टक्के इतके झाले आहे.
आज राज्यात करोनामुळ 594 जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर हा 1.54 टक्के इतका आहे. राज्यात 30 लाख 59 हजार 95 रुग्ण गृह विलगीकरणात आहेत. तर 23 हजार 828 रुग्ण संस्थात्मक विलगीकरण कक्षात आहेत.
- Advertisement -
आतापर्यंत राज्यात 3 कोटी 18 लाख 74 हजार 364 जणांचा करोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. त्यापैकी 54 लाख 67 हजार 537 जणांना करोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. सध्या राज्यात 4 लाख 1 हजार 695 सक्रीय करोना रुग्ण आहेत.