Thursday, January 8, 2026
Homeनगरकापूस, सोयाबीनचे अनुदान खात्यात वर्ग

कापूस, सोयाबीनचे अनुदान खात्यात वर्ग

साडेतीन लाख शेतकर्‍यांची केवायसी पूर्ण

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

कापूस आणि सोयाबीन अनुदानासाठी राज्य सरकारच्यावती निकषानूसार पात्र असणार्‍या नगर जिल्ह्यातील 5 लाख 30 हजार शेतकर्‍यांपैकी 3 लाख 52 हजार 260 शेतकर्‍यांच्या खात्यांचे कृषी विभागाकडून ई-केवासी पूर्ण करण्यात आली आहे. दरम्यान, सोमवार (दि. 30) पासून राज्य सरकारच्यावतीने अनुदान वाटपास सुरूवात करण्यात आली आहे. नगर जिल्ह्यात पात्र असणार्‍या शेतकर्‍याच्या बँक खात्यावर अनुदान वर्ग होणार आहे. जिल्ह्यात अद्याप 1 लाख 78 हजार 391 शेतकर्‍यांच्या खात्याची ई-केवायसी बाकी असून येत्या आठ दिवसात ती पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली.

- Advertisement -

दरम्यान, मागील आठवड्यात कापूस आणि सोयाबीन पिकांच्या मदतीसाठी राज्य सरकारने काही अटी शिथील केल्या आहेत. यामुळे जिल्ह्यातील 70 हजारांहून अधिक संयुक्त खाते असणारे शेतकरी या अनुदानासाठी पात्र ठरणार आहेत. यामुळे आधीच पाच लाख 30 हजार आणि आता नव्याने 70 हजार संयुक्त खातेदार असे जिल्ह्यात जवळपास सहा लाख शेतकर्‍यांना कापूस आणि सोयाबनीचे अनुदानासाठी पात्र ठरणार असल्याचा कृषी विभागाचा अंदाज आहे. राज्य सरकारने 2023 च्या खरिप हंगामात कापूस व सोयाबीन पिकांचे उत्पादन घेणार्‍या शेतकर्‍यांना 0.2 हेक्टरपेक्षा कमी क्षेत्रासाठी सरसकट 1 हजार रुपये आणि दोन हेक्टरपर्यंत प्रति हेक्टर 5 हजार रुपयांचे अर्थसहाय्य देण्याची घोषणा केली होती.

YouTube video player

त्यानूसार नगरसह राज्यभर कृषी विभागाकडून माहिती संकलीत करण्यात येत आहे. नगर जिल्ह्यात 5 लाखांहून अधिक शेतकरी सरकारच्या या मदतीसाठी पात्र आहेत. यासह 70 ते 75 हजार सामुहिक खाते असणारे शेतकरी आहेत. त्यासाठी राज्य सरकारने निर्णय घेत सामायिक खात्यांमध्ये आर्थिक मदतीचा लाभ घेण्यासाठी खातेदारांना दुसर्‍या खातेदारांची संमती घेऊन स्वयंघोषणापत्र सादर करत येणार आहे. याबाबत स्वयंघोषणापत्र दिल्यानंतर मदत थेट आधार संलग्न बँक खात्यात जमा होणार आहे. जिल्ह्यात कापूस अनुदानासाठी 2 लाख 17 हजार 778 शेतकरी पात्र असून सोयाबीन अनुदानासाठी 3 लाख 12 हजार 780 शेतकरी पात्र आहेत.

यातील 3 लाख 52 हजार शेतकर्‍यांची केवायसी पूर्ण करण्यात आली असून उर्वरित 1 लाख 78 हजार शेतकर्‍यांची केवायसीचे काम येत्या आठ दिवसात पूर्ण करण्यात येणार आहे. राज्य सरकारकडून सोमवारपासून पात्र शेतकर्‍यांच्या खात्यावर अनुदान वर्ग करण्यास सुरूवात करण्यात आली असून नगर जिल्ह्यातील शेतकर्‍यांच्या खात्यावर अनुदान वर्ग झाले आहे. मात्र, वर्ग झालेल्या अनुदानाची माहिती सरकार पातळीवरून असून येत्या आठ दिवसांनी याबाबतची आकडेवारी उपलब्ध होणार असल्याचे सुत्रांकडून सांगण्यात आले.

केवायसी पूर्ण झालेले शेतकरी
अकोले 21 हजार 645, जामखेड 19 हजार 840, कर्जत 7 हजार 192, कोपरगाव 27 हजार 969, नगर 17 हजार 616, नेवासा 46 हजार 56, पारनेर 24 हजार 465, पाथर्डी 31 हजार 639, राहाता 27 हजार 284, राहुरी 29 हजार 243, संगमनेर 31 हजार 681, शेवगाव 32 हजार 677, श्रीगोंदा 15 हजार 142, श्रीरामपूर 19 हजार 811 असे आहेत.

ताज्या बातम्या

Nashik Crime : पैशांवरून बालमित्रांत वैर; वसुलीसाठी थेट जाळपोळ

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik बालपणापासूनची घट्ट मैत्री, वर्षानुवर्षांचा विश्वास आणि त्यातून झालेले कोट्यवधींचे आर्थिक व्यवहार अखेर गंभीर वैरात बदलून थेट जाळपोळीपर्यंत पोहोचल्याची खळबळजनक घटना...