Monday, April 28, 2025
Homeमुख्य बातम्यासंरक्षण क्षेत्रात जाण्याचे धाडस अभिनंदनीय : मुख्यमंत्री

संरक्षण क्षेत्रात जाण्याचे धाडस अभिनंदनीय : मुख्यमंत्री

नाशिक । प्रतिनिधी Nashik

प्रत्येक क्षेत्रामध्ये मुलींच्या गरुडभरारीचा राज्याचा इतिहास आहे. त्यांना योग्य व्यासपीठ व प्रोत्साहन देण्याची गरज आहे. देशाच्या संरक्षणासाठी जाण्याचे धाडस दाखवणार्‍या या 30 मुलींच्या पालकांचे खर्‍या अर्थाने अभिनंदन करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

- Advertisement -

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

त्र्यंबकरोडवरील पत्रकार कॉलनीलगत असलेल्या शासकीय इमारतीमध्ये सैनिकी सेवापूर्व शिक्षण संस्थेच्या कार्यालयाच्या उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ, ग्रामविकास व पर्यटनमंत्री गिरीश महाजन, जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे, खा. हेमंत गोडसे, आ. दिलीप बनकर, आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. माधुरी कानिटकर, जिल्हाधिकारी गंगाथरन डी., जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी अशीमा मित्तल, धावपटू कविता राऊत आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी बोलताना मुख्यमंत्र्यांनी अनेक कार्यक्रमांपेक्षा हा आगळावेगळा कार्यक्रम असल्याचे अधोरेखित केले. सरकार अशा संस्थेच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहणार असून, देशसेवेसाठी जागृत झालेल्या मुलींंना सर्वतोपरीने सहकार्य करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. राष्ट्रीय सुरक्षा क्षेत्रात राज्याने पुढाकार घेतलेला होता. मुलींच्या प्रशिक्षण केंद्राची सुरुवात ही राज्याने केली आहे. देशात राज्य हे ‘ग्रोथ इंजिन’म्हणून काम करीत असल्याचे त्यांनी नमूद केले. या केंद्रावर ग्रंथालय, मैदान, तांत्रिक उपकरणे, यासह विविध सुविधा पुरवाव्यात. यांना काहीही कमी पडणार नाही, यासाठी लक्ष देण्याचे आवाहन केले. राज्याला अभिमान वाटावा, असे हे केंद्र ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी ही मुलींसाठी उघडण्याचा निर्णय कौतुकास्पद असल्याचे सांगितले. अतिशय दुर्लक्षित इमारतीचा योग्य उपयोग केल्याबद्दल त्यांनी दादा भुसे यांचे अभिनंदन केले. राज्याच्या मातीत शौर्य त्याग व पराक्रमाची परंपरा आहे. जिजाऊ, ताराबाई, रमाई यासारख्या व्यक्तिमत्वांच्या कर्तृत्व आणि शक्तीचा वारसा आहे. मुली या वारसा पुढे नेतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. पूर्वी शासकीय कामांमध्ये वशिला चालत होता. मात्र हल्ली वशिल्याचे दिवस गेले आहेत. आज ‘मेरीट’चा जमाना आहे. त्यामुळे गुणवत्तेच्या बळावरच आपल्याला सर्व काही मिळवावे लागत असल्याने 3 हजार मुलींमधून निवडलेले 30 मुलींचे त्यांनी अभिनंदन केले.

यावेळी पालकमंत्री दादा भुसे यांनी भारतातीलही एकमेव शाखा असल्याचे नमूद करून नाशिकमध्ये पूर्व प्रशिक्षण सुरू करण्यात आले. राज्यातून चार हजार प्रवेशिका या प्रशिक्षणासाठी दाखल झाल्या होत्या. त्यातील 300 गुणवंतांची प्राथमिक फेरीत निवड करण्यात आली आणि प्रवेशासाठी अंतिम 30 मुलींची निवड करण्यात आली असल्याचे सांगून पूर्व प्रशिक्षणात या सक्षमपणे काम करतील, असा विश्वास व्यक्त केला. या मुलींमध्ये पाणीपुरीचा स्टॉल चालवणार्‍या पालकांची यात मुलीचा सहभाग असल्याचे अभिमानाने सांगितले.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रशिक्षक सय्यदा फिरजाद यांनी उपस्थितांचे स्वागत केले. सेवा प्रतिष्ठित प्रशिक्षण 1977 मध्ये थोरात कमिटीद्वारे सुरू करण्यात आल्याचे सांगितले. ंपालकमंत्री भुसे यांच्या प्रयत्नातून हे प्रशिक्षण केंद्र सुरू होत असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. यावेळी जितूभाई ठक्कर, सचिन जोशी, स्वप्निल तोरणे आदींसह शिक्षण क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

तीव्र

मुलगी IAS झाल्याच्या आनंदोत्सवात वडिलांचे ह्रदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन

0
यवतमाळ | Yavatmal यवतमाळ जिल्ह्यातील महागाव तालुक्यातील वागद ईजारा येथे आनंदाचा क्षण दुसऱ्या मिनिटाला दु:खात बदलला.मुलगी आयएएस अधिकारी झाल्याचा आनंद साजरा करताना वडिलांना हृदयविकाराचा तीव्र...