Thursday, May 15, 2025
Homeक्राईमCrime : विशांत भोये खूनप्रकरणी पाच संशयित ताब्यात

Crime : विशांत भोये खूनप्रकरणी पाच संशयित ताब्यात

युनिट एकची कारवाई

नाशिक। प्रतिनिधी Nashik

- Advertisement -

पंचवटीतील अमृतधामजवळील विडी कामगार नगर परिसरात पूर्ववैमन्यसातून रविवारी (दि.२४) रात्री जमावाने विशांत भोये याचा खून केला होता. याप्रकरणात गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने तपास करीत येवला तालुका, विल्होळी व मुंबईनाका परिसरातून पाच संशयितांना पकडले आहे. त्यात दोन महिलांचा सहभाग आहे.

हे देखील वाचा– Judgment of the Court : अल्पवयीन मुलीवर प्राणघातक हल्ला; आरोपीस सक्तमजुरीची शिक्षा

सूरज रवींद्र मोहिते (२२), रविंद्र साहेबराव मोहिते (४३), मच्छिंद्र उत्तम जाधव (३८, तिघे रा. बीडी कामगार नगर) यांच्यासह इतर दोन महिलांना पोलिसांनी अटक केली आहे. विशांत उर्फ काळू राजाराम भोये (२४) असे खुन झालेल्या युवकाचे नाव आहे.

हे देखील वाचा – Cyber Crime : आधार कार्ड अपडेट करण्याचा केला बहाणा; तीन लाख रुपयांना घातला गंडा

प्रशांत भोये याने दिलेल्या फिर्यादीनुसार, संशयित नितीन पंजाबराव पवार उर्फ विक्की व परिसरातील एका अल्पवयीन मुलाचा वाद सुरु असल्याने विशांत याने मध्यस्थी केली. त्यात एकाने शिवीगाळ केल्याने विशांतने त्यास मारहाण केली. त्यानंतर नितीन व अल्पवयीन मुलाच्या नातलगांनी विशांतला जीवे मारण्याची धमकी दिली होती.

हे देखील वाचा – Accident : कार-दुचाकीचा अपघात; पती-पत्नीचा मृत्यू

रविवारी (दि.२४) विशांत रात्री दहाच्या सुमाराम त्याच्या मित्रांसह गप्पा मारत असताना पाच संशयितांसह रेखा मोहिते व मंदा जाधव या संशयितांनी विशांतच्या डोळ्यात मिरची पूड फेकत हल्ला केला. तसेच विशांतला मारहाण करीत धारदार शस्त्राने वार करून जीवे मारले. याप्रकरणी आडगाव पोलिस ठाण्यात संशयितांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल आहे.

गुन्हा घडल्यानंतर पोलिसांनी संशयित नितीनसह अल्पवयीन मुलास पकडले. तर इतर संशयित पसार झाले. त्यानुसार वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक मधुकर कड यांच्या सुचनेनुसार, सहायक निरीक्षक हेमंत तोडकर, उपनिरीक्षक चेतन श्रीवंत, हवालदार महेश साळुंके, रवींद्र आढाव, प्रविण वाघमारे, प्रशांत मरकड, विशाल काठे व महिला अंमलदारांंच्या पथकाने संशयितांची धरपकड केली.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Rajnath Singh : “धर्म विचारून त्यांनी निरपराधांचा बळी घेतला, आपण कर्म...

0
नवी दिल्ली | New Delhi  जम्मू-काश्मीरच्या (Jammu-Kashmir) पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात २६ भारतीय पर्यटकांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर (Operation Sindoor) राबवत पाकिस्तानमधील...