संगमनेर | वार्ताहर | Sangmner
- Advertisement -
राज्यातील ज्या ग्रामपंचायतीची मुदत संपली आहे. त्या ग्रामपंचायती वरती प्रशासक नियुक्तीचे निकष राज्याच्या ग्रामविकास विभागाच्या वतीने जाहीर करण्यात आले आहे. सध्याच्या कार्यरत असलेल्या सदस्यांमधून प्रशासक नियुक्त केला जाणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
शासनाने दिलेल्या आदेशात स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे की ज्या ग्रामपंचायती ची मुदत संपली आहे अशा ग्रामपंचायत वरती प्रशासक नियुक्त करताना तो प्रशासक संबंधित गावचा रहिवासी असला पाहिजे. त्याचबरोबर त्याचे स्थानिक मतदार यादीत नाव असणे आवश्यक आहे. सदरचे प्रशासकीय पद हे कोणत्याही प्रवर्गासाठी राखीव असणार नाही.