Sunday, May 19, 2024
Homeमुख्य बातम्या“तुमचे ‘नड्डे’ केव्हा सैल होतील, हे…”; फडणवीसांचं उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर

“तुमचे ‘नड्डे’ केव्हा सैल होतील, हे…”; फडणवीसांचं उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर

मुंबई | Mumbai

ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सडकून टीका केली आहे. पाटण्यातील विरोधकांची बैठक ही कुटुंब बचाओ मोहीम होती, अशी टीका काल फडवणीस यांनी केली होती. त्याला आज उद्धव ठाकरेंनी चांगल्याच शब्दांत उत्तर दिलं आहे. “देवेंद्रजी एवढ्या पातळीवर येऊ नका, परिवार तुम्हाला सुद्धा आहे. आम्ही त्यावर बोललेलो नाही. जर आम्ही बोललो तर तुम्हाला शवासन करावं लागेल. त्यामुळे परिवारावर बोलू नका, कारण मी माझ्या परिवाराबाबत संवेदनशील आहे,” असं उद्धव ठाकरे म्हणाले. तर ठाकरे यांच्या या टीकेवर देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करत प्रत्युत्तर दिलं आहे.

- Advertisement -

उद्धव ठाकरेंना उद्देशून केलेल्या ट्वीटमध्ये देवेंद्र फडणवीस म्हणाले, “मी, माझे कुटुंब आणि माझा संपूर्ण भाजपा परिवार एक खुली किताब (पुस्तक) आहे. ज्या ‘व्हॉट्सअ‍ॅप चॅट’बाबत तुम्ही बोलत आहात, तो आरोपपत्राचा भाग आहे. हे न्यायालयाच्या रेकॉर्डवर आहे. ते जाणीवपूर्वक टाकले आहेत. कारण आमच्याकडे लपवण्यासारखं काहीच नाही. पण मुख्यमंत्रीपदी राहिलेल्या माणसाला इतकी ‘बालबुद्धी’ असावी, याचं मात्र आश्चर्य वाटते. त्यामुळे त्याची फार चिंता तुम्ही करु नका. चिंता करायचीच असेल आणि पुस्तक काढायचेच असेल तर, सामान्य शिवसैनिकांना वार्‍यावर सोडून मुख्यमंत्रीपद, मंत्रीपद घरात कसे ठेवले? मुंबईला कुणी लुटले? मृतांच्या टाळूवरील लोणी कुणी खाल्ले? मराठी माणसाला कुणी ओरबाडले? १०० कोटींच्या वसुलीचे टार्गेट कसे दिले जाते? यावर पुस्तक काढा. तुमचं हिंदुत्व आणि तुमचे कारनामे आता एकेक करीत जनतेत उघड होतच आहेत आणि होतच राहणार, असंही फडणवीस म्हणाले. आम्ही कुणाच्या घरात घुसत नाही. पण घुसलोच तर त्यांना तोंड दाखवायला जागा उरणार नाही. तुमचे ‘नड्डे’ (नड्डे म्हणजे घसा) केव्हा सैल होतील, हे समजणारदेखील नाही. तोवर तुमची हास्यजत्रा चालू द्या. आता शवासन कुणाला करावं लागतं, ते बघूच” असा थेट इशारा देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना दिला.

“नवाब शरीफ यांचा केक कापायला आम्ही…”; फडणवीसांच्या टीकेवर राऊतांचं प्रत्युत्तर
लळा असा लावावा की…! लाडक्या गुरूजींच्या बदलीने विद्यार्थीच नव्हे तर अख्खं गाव रडलं, भावूक करणारा VIDEO

उद्धव ठाकरे नेमकं काय म्हणाले?

देवेंद्रजी तुम्हाला ही परीवार आहे. त्यामुळे परिवारावर बोलू नका. तुमचे मॅसेज कसे बाहेर येत आहेत ते पहा तुमचा परिवार कुणासोबत आहे ते पहा माझा परिवार माझ्या सोबत आहे. तुम्ही बोलता ना आम्ही परिवारवादी आहेत मग ऐका जनतेचा आवाज. परिवारावर येऊ नका शिवसेना हा आमचा परीवार आहे. चौकशीच करायची असेल तर ठाणे महापालिकेची करा. संजय केळकर भाजपचा आमदार त्याला लाच घेताना रंगेहात पकडले होते. तिथे देवेंद्रजीलाच किंमत नाही तिथे संजय केळकर ची काय किंमत आहे. रतन टाटा यांनी पीएम केअर फंडला एक रक्कमी दीड हजार कोटी दिले कुठे गेले ते पैसे? कोट्यवधी रुपये जमा झाले ते गेले कुठे? असा सवाल ठाकरेंनी केला.

- Advertisment -

ताज्या बातम्या