Saturday, March 29, 2025
Homeधुळेगरम पाणी अंगावर पडल्याने बालकाचा मृत्यू

गरम पाणी अंगावर पडल्याने बालकाचा मृत्यू

धुळे  – 

खेळतांना पातेल्यात ठेवलेले गरम पाणी अंगावर पडल्याने अडीच वर्षीय बालकाचा मृत्यू झाल्याची हद्यद्रावक घटना देवपूरात घडली. उपचारादरम्यान त्याचा काल मृत्यू झाला.

- Advertisement -

याबाबत देवपूर पेालिसात नोंद करण्यात आली आहे. घटनेमुळे हळहळ व्यक्त होत आहे कार्तिकेय मनिष चव्हाण (वय रा. प्लॉट न. 83, तिरूपती नगर, देवपूर, धुळे) असे बालकाचे नाव आहे.

घरी दि. 10 रोजी दुपारी नागलीचे पापड तयार करण्याचे काम सुरू होते. त्यासाठी पातेल्यात गरत पाणी ठेवलेले होते. घरात कार्तिकेय खेळत असतांना ते गरम पाणी त्यांच्या अंगावर पडल्याने त्याला शहरातील खाजगी रूग्णालयात दाखल केले.

तेथुन नाशिक येथे खाजगी रूग्णालयात नेले. नंतर आणखी दुसर्‍या रूग्णालयात हलविण्यात आले. तब्बेत बरी नसल्याने त्याला काल दि. 14 रोजी धुळे येथे घेवून येत असतांनाच अखेर रस्त्यातच त्याचा मृत्यू झाला.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

संपादकीय : २९ मार्च २०२५ – वल्लीमध्ये जीवन। नाना फळीफुली जीवन।

0
वसुंधरेच्या जीवसृष्टीतील झाडांचे महत्त्व सर्वोच्च न्यायालयाने पुन्हा एकदा मानवी मनावर ठसवण्याचा प्रयत्न केला आहे. झाडे तोडणे मानवी हत्येपेक्षाही गंभीर आहे अशी टिप्पणी केली आहे....