नाशिक । प्रतिनिधी Nashik
गोदावरी संवर्धनामध्ये( conservation of Godavari River) तीन वर्षांपूर्वी फरशी सुधारणा दिसून आली नाही. आजही गोदावरी मरणासन्नच आहे.तिला सौंदर्य बहाल करण्यापेक्षा तिच्या संवर्धनावर लक्ष देण्याची गरज आहेे, असा सल्ला जलतज्ज्ञ राजेंद्र सिंह ( Hydrologist Rajendra Singh)यांनी केले. नाशिकच्या गोदावरी संंवर्धनावर उपाययोजनांसोबतच नदी साक्षरता अभियानाद्वारे जनजागृतीची गरज असल्याचे त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…
राजेंद्र सिंह यांनी नाशिकमध्ये नदी पहाणी केली. त्यात त्यांनी शहर परिसरातील अगस्ती, मातोरी, दरी, मातोरी, ब्रम्हगिरी, गोदावरी, नंदिनी अशा विविध ठिकाणी भेट देऊन गोदावरीच्या व नंदिनीच्या पाण्याचे जलस्तर आणि प्रदुषणाची पहाणी केली.त्याबाबत बोलताना जलतज्ज्ञ राजेंद्र सिंह यांनी जोपर्यंत रिव्हर व सिवर एकमेकापासून स्वतंत्र केले जाणार नाही तोपर्यंत नदीचा र्हास थांबणार नाही. आज गोदावरीमध्ये गोदावरीचे पाणी नव्हे तर गटारीतून मलमूत्र वाहत असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला.प्रत्यक्षात गोदावरीचा आजार वेगळा आणि उपचार वेगळा अशी परिस्थिती असून त्या दुरुस्त होण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
नाशिक हे तीर्थस्थान आहे. त्याला तिर्थाच्या दिशेनेच नेला पाहिजे. आपण त्याला पर्यटनाच्या दिशेने नेत आहोत हे चुकीचे आहे. तीर्थायटनाचे पावित्र्य राखून पर्यटन विकास केला पाहिजे. नदीची इकोलॉजी व पर्यावरण पूरक वाहण्याला आपण सन्मानाने पाहिले पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.
प्रशासनाच्या भूमिकेबाबत निर्देश करताना राजेंंद्र सिंह यांनी सुरज मांढरे यांच्या कार्याचा गौरव केला. त्यांनी खर्या अर्थाने या दृष्टीने प्रयत्न केले होते मात्र त्यांनाही हटवण्यात आले. त्यांनी इकॉलॉजिकल प्रोटेक्शन कायदा बनवण्यासाठी प्रयत्न केला. मात्र ‘कन्सर्वेशन एरिया’ म्हणून आरक्षण देण्यात त्यांनी यश मिळवले होते.
मनपा व जिल्हा परिषद अधिकार्यांशी संवाद साधल्यानंंतर या दोन्ही अधिकार्यांनी नदी संवर्धनासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले जिल्हाभरातून टँकर मुक्त गाव करण्याच्या दृष्टीने जिल्हा परिषदेने पावले उचलली आहेत. शहरात बायोसॅनिटायझरद्वारे प्रक्रिया करून पाणी नदीत सोडणाऱा प्रकल्पही अधिकार्यांनी दाखवला.
यावेळी जल मिशनमध्ये काम करणार्या चिन्मय खेडेकर यांनी रेन वॉटर हार्वेस्टिंगची गरज अधोरेखित केली. पावसाचे पाणी वाहून जात असल्याने ते जमिनीत मुरुन पाण्याची पातळ वाढवण्यासाठी सर्वच स्तरांवर प्रयत्न होण्याची गरज असल्याचे सांगितले. भूजल साठा वाढवण्याची विशेष मोहीम हाती घेण्याची गरज आहे. जुन्या इमारतींना ते आवश्यक करण्याचे निर्देश शासनाने देणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.
पर्वतांची इकॉलॉजी महत्वाची
ब्रह्मगिरीच्या व सारोळ येथील खोदकामाची पाहणी केल्यानंतर त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.प्रत्यक्षात ब्रह्मगिरी पर्वत सांभाळण्याची गरज आहे. ब्रह्मगिरीची हिरवळ ही गोदावरीचे पावित्र्य राखण्यासाठी महत्त्वाचे आहे पर्वतांवर मोठ्या प्रमाणात जैवविविधता आढळून येते.खाणकामामुळे त्यांचा नाश होत आहे. मोठया पर्वतांवरची जैवविविधता पाण्याची पातळी राखून ठेवते.