नाशिक । Nashik
महाविकास आघाडिने शेतकर्यांना दोन लाख रुपयांपर्यत दिलेले कर्ज माफिचे आश्वासन पूर्ण केले असून नाशिक जिल्ह्याला एक हजार ९० कोटी ९३ लाखांचा निधी प्राप्त झाला आहे. जिल्ह्यातील १ लाख १० हजार २९० शेतकर्यांच्या खात्यात कर्जमाफिचे दोन लाख रुपयांची रक्कम जमा झाली असून अनेक अल्प भुधारक शेतकरी कर्जमुक्त झाले आहे. त्यामुळे खरिप हंगामासाठी शेतकर्यांना नवीन कर्ज मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. कर्जमाफिचे पैसे जमा झाल्याने लाभार्थी शेतकर्यांमध्ये आंनदाचे वातावरण आहे.
सत्तेत आल्यावर शेतकर्यांना कर्जमुक्त करणारच हे वचन उध्दव ठाकरे यांनी निवडणुकीत दिले होते. त्यानूसार महाविकास आघाडिची सत्ता आल्यावर मुख्यमंत्री ठाकरे यांनी महात्मा फुले कर्जमाफी योजनेची घोषणा करत कोणतिहि अटीशर्ती न लावता शेतकर्यांचे दोन लाखांपर्यतचे कर्ज माफ़ करत मोठा दिलासा दिला. जिल्ह्यातील १ लाख ३३ हजार २१६ शेतकरी कर्जमाफिसाठी पात्र ठरले. त्यासाठी १४४५ कोटी ९८ लाखाची आवश्यकता होती. बॅंक खाते आधारलिंक करुन थेट त्यांच्या खात्यावर ही रक्कम जमा केली जाणार होती.
त्यानुसार पहिल्या टप्प्यात निफाडमधील चांदोरी अाणि सिन्नरमधील सोनांबे या दोन गावांतील अनुक्रमे ५२० तर सोनांबेतील २५८ शेतकऱ्यांच्या खात्यावर दोन लाख कर्जमाफिची रक्कम जमा झाली. मात्र, त्यानंतर मार्चच्या प्रारंभी जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकिची आचारसंहिता लागू झाली व कर्जमाफिचा लाभ मिळू शकला नाही. त्यानंतर करोनाचे संकट आले. तिजोरीत खडखडाट असल्याने कर्जमाफिसाठी शासनाकडे पैसे नव्हते. मात्र जुलै महिन्यात सरकारने लाभार्थ्यांना कर्ज माफीचा लाभ देण्यास सुरुवात केली.
जिल्ह्यात १ लाख ३३ हजार शेतकरी कर्जमाफिसाठी पात्र ठरले. त्यापैकी १ लाख १८ हजार ७९९ खात्यांचे प्रमाणिकरण करण्यात आले. तर ४ हजार ९०२ खाते तांत्रिक माहिती अभावी अपात्र ठरले. कर्जमाफिसाठी एक हजार ९० कोटी बॅकांना प्राप्त झाले. एक लाख १८ हजार ७९९ लाभार्थी शेतकर्यांच्या खात्यावर कर्जमाफिची दोन लाख रुपयांची रक्कम जमा करण्यात आली आहे.
बॅकांना प्राप्त रक्कम
जिल्हा बॅक – ८७५ कोटी २३ लाख
राष्ट्रियकृत व पतसंस्था – १३४ कोटी ७० लाख