Tuesday, April 1, 2025
Homeदेश विदेश2022 पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या दृष्टीने प्रयत्न – अर्थमंत्री

2022 पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या दृष्टीने प्रयत्न – अर्थमंत्री

टीम देशदूत :  २०२२ पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी सरकार प्रयत्नशील राहणार आहे. यासाठी शेतकऱ्यांना जोडव्यवसाय करण्यास प्रोत्साहित केले जाईल. पीएम किसान योजनेअंतर्गत 16 कलमी कार्यक्रम राबवला जाईल.

100 दुष्काळ ग्रस्त जिल्ह्यांसाठी खास कार्यक्रम राबवला जाणार आहे. शेतीसाठी सौरऊर्जा वापरायला प्रोत्साहन देणार असल्याचे त्या म्हणाल्या. सेंद्रिय खतं वापरण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन देणार असल्याचं त्यांनी सांगितले.

- Advertisement -

2020 पर्यंत जनावरांसाठी 108 मिलियन टन पर्यंत चारा उपलब्ध होईल, यासाठी प्रयत्न करण्यात येईल. ​मासळी उत्पादन वाढण्यासाठी विविध योजना राबविण्यात येतील.

रासायनिक खत खाद्यसाठी नवे धोरण आखण्यात येईल. सेंद्रिय शेतीसाठी यापुढे अधिक प्रोत्साहन दिले जाईल. समुद्र किनारी राहणाऱ्या तरूणा वर्गाला रोजगार मिळावा यादृष्टीने प्रयत्न केले जाणार आहेत.

​2.83 लाख कोटी रुपयांची शेती आणि शेतीविषयक कामांसाठी तरतूद करण्यात आल्याची माहिती अर्थमंत्र्यांनी दिली.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Ahilyanagar : रेडीरेकनेर दरात वाढघरे-मालमत्ता महागली

0
मुंबई | Mumbai आर्थिक वर्ष संपताच राज्य सरकारने रेडी रेकनर दरात मोठी वाढ केली असून याचा फटका मालमत्ता खरेदी करणार्‍यांना बसणार आहे. महानगरपालिका क्षेत्रात 5.95%...