Thursday, May 15, 2025
Homeब्रेकिंग न्यूजRajan Salvi : उद्धव ठाकरेंची साथ का सोडली? साळवींनी 'या' नेत्यावर आरोप...

Rajan Salvi : उद्धव ठाकरेंची साथ का सोडली? साळवींनी ‘या’ नेत्यावर आरोप करत सगळंच सांगितलं

मुंबई | Mumbai

- Advertisement -

ठाकरे गटाचे माजी आमदार राजन साळवी (Rajan Salvi) आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि सामंत बंधूच्या नेतृत्त्वाखाली शिंदेच्या शिवसेनेत (Shinde Shivsena) प्रवेश करणार आहेत. मात्र, शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करण्याआधी राजन साळवी यांनी माध्यमांशी संवाद साधत माजी खासदार विनायक राऊत (Vinayak Raut) यांच्यावर घणाघाती टीका केली आहे. तसेच त्यांच्यामुळेच ठाकरेंची शिवसेना सोडत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

यावेळी बोलतांना साळवी म्हणाले की,”विधानसभा निवडणुकीतील (Assembly Elections) पराभव माझ्या जिव्हारी लागला. या निवडणुकीत माझ्या पक्षातील नेत्यांनीच माझ्याविरुद्ध काम केलं. विनायक राऊत हेच माझ्या पराभवाला कारणीभूत आहेत. त्यांच्यामुळे मी पक्ष सोडत आहे. विनायक राऊत यांनी माझ्याविरोधात काम केलं. कोणत्याही चौकशीला आम्ही घाबरत नाही, तेव्हाही मी घाबरलो नाही, आताही मी घाबरत नाही”, असे म्हणत माजी आमदार राजन साळवी यांनी आपण उद्धव ठाकरेंची साथ का सोडत आहोत, याचे कारण सांगितले.

पुढे ते म्हणाले की,”गेली ३८ वर्ष मी शिवसेना पक्षाचे काम करत आहे. गेली तीन टर्म आमदार (MLA) म्हणून काम केले. पाच वेळेस विधानसभेच्या निवडणुका लढवल्या. २००६ मध्ये मी पराभूत झालो. पण २०२४ मधील पराभव माझ्या जिव्हारी लागला.या निवडणुकीत पक्षातील लोकांनीच माझ्याविरुद्ध काम केले. विरोधी पक्षाच्या उमेदवाराला मदत केली असं माझं ठाम मत झालं. माझा पराभव (Defeat) कसा झाला त्याबद्दल माहिती देण्यासाठी मी उद्धव ठाकरेंनाही भेटलो. मात्र, नंतरच्या काळात मी शांत होतो. पण सहकाऱ्यांच्या सूचनांप्रमाणे रत्नागिरी जिल्हा विकासाकडे न्यायचा असेल तर मला सत्तेत असलेल्या एखाद्या पक्षात जावं लागेल. एकनाथ शिंदे यांच्याकडे बाळासाहेबांचे विचार आणि पक्षचिन्ह आहे. त्यामुळे सर्वांच्या सूचनेनंतर आम्ही शिवसेनेत (शिंदे गट) प्रवेश करण्याचा निर्णय घेतला”, असे त्यांनी म्हटले.

साळवींनी केलेल्या आरोपांवर विनायक राऊत काय म्हणाले?

माजी खासदार विनायक राऊत यांनी राजन साळवी यांनी केलेल्या आरोपांवर बोलतांना म्हटले की,”एकदा अपयश मिळाल की सत्तेच्या हव्यासापोटी कोणावर तरी खापर फोडाव लागतं. प्रत्येक निवडणुकीमध्ये त्यांनी घेतलेली धरसोड भूमिका आणि मतदारसंघात असलेली त्यांची डागाळलेली प्रतिमा ही त्यांच्या पराभवाला कारणीभूत ठरली. हे त्यांना मान्य करावचं लागेल. रिफायनरीची दलाली करत असताना तेथील लोकांचा आक्रोश त्यांच्या कानावर आला नाही. त्यांचा विधानसभेमध्ये पराभव झाल्याच्या दुसऱ्या दिवसांपासूनच त्यांनी भविष्यासाठी मार्ग शोधायचा जो प्रयत्न केला होता त्याच्यातून शिंदेंच्या शिवसेनेत जाण्याचा सूचना त्यांनी प्रत्येक गावामध्ये जाऊन केल्या होत्या”, असेही ते म्हणाले.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

आग

Lucknow: लखनौत अग्नितांडव! चालत्या बसला भीषण आग; ५ प्रवाशांचा होरपळून मृत्यू,...

0
लखनौ | Lucknow उत्तर प्रदेशच्या लखनौमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. गुरुवारी सकाळी किसनपथ परिसरात धावत्या बसने अचानक पेट घेतली. या अपघातात ५ प्रवाशांचा...