Saturday, June 7, 2025
HomeनाशिकAI Policy : महाराष्ट्राचे पहिले एआय धोरण तयार करा - माहिती आणि...

AI Policy : महाराष्ट्राचे पहिले एआय धोरण तयार करा – माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार यांचे निर्देश

मुंबई । प्रतिनिधी Mumbai

आर्टिफिशियल इंटेलिजन्स अर्थात कृत्रिम प्रज्ञा या तंत्रज्ञानाच्या जागतिक स्पर्धेत महाराष्ट्राने दिशादर्शक व्हावे यासाठी राज्याचे पहिले एआय धोरण तयार केले जाणार आहे. माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री आशीष शेलार यांनी बुधवारी यासंदर्भात विभागाला निर्देश दिले. एआय तंत्रज्ञानाचा वापर करून अधिक उद्योग, व्यवसाय उभे राहतील. तरुणांना रोजगार मिळतील आणि तंत्रज्ञानाच्या जागतिक स्पर्धेत महाराष्ट्र सक्षमपणे स्पर्धा करु शकेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.

- Advertisement -

सह्याद्री अतिथीगृहावर आयोजित बैठकीत शेलार यांनी आज माहिती आणि तंत्रज्ञान विभागाच्या कामकाजाचा आढावा घेतला. यावेळी बोलताना शेलार म्हणाले, एआय तंत्रज्ञानाचे युग सुरू झाले आहे. महाराष्ट्राने या क्षेत्रात आघाडी घेतली पाहिजे. एआयचा प्रभावी उपयोग करून आपण अधिक उद्योग आणि व्यवसाय आकर्षित करीत तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देऊ शकतो. जागतिक स्पर्धेत महाराष्ट्राचे स्थान भक्कम करण्याची ही संधी आहे.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

मार्च २०२४ मध्ये सुरू करण्यात आलेल्या ‘इंडिया एआय मिशन’ अंतर्गत देशभरात एआय क्षमता वाढवण्यासाठी १० हजार ३७२ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. यात इंडिया एआय डेटासेट्स प्लॅटफॉर्म, ऍप्लिकेशन डेव्हलपमेंट प्रकल्प, ग्राफिक प्रोसेसिंग युनिट्स, इंडिया एआय इनोव्हेशन सेंटर, फ्युचर स्किल्स प्रोग्राम आणि एआय क्षेत्रातील स्टार्टअप्ससाठी वित्तपुरवठा यांचा समावेश आहे. केंद्र सरकार जानेवारी २०२५ पासून वैयक्तिक नसलेल्या डेटासेट्सचे संकलन सुरू करणार आहे. यामुळे स्टार्टअप्स, कंपन्या, शैक्षणिक संस्था आणि संशोधका ॲप्स विकसित करण्यासाठी, विविध भाषांची सेवा देण्यासाठी तसेच आणि विशेष सेवा देण्यासाठी उपयोग होणार आहे, असे शेलार यांनी बैठकीत सांगितले.

आपला देश तंत्रज्ञानाच्या आघाडीवर प्रगती करत असताना महाराष्ट्र यात अग्रेसर राहिला पाहिजे, असेही आशीष शेलार यांनी सांगितले. या बैठकीला विभागाचे सचिव पराग जैन नैनुटिया, महाआयटीच्या व्यवस्थापकीय संचालक जयश्री भोज आणि संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Chandrashekhar Bawankule : “देशाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करू नका, आपले अपयश…”;...

0
मुंबई | Mumbai काँग्रेसचे नेते व लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी २०२४ महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार झाल्याचा आरोप करत भाजपवर निवडणूक चोरीचा...