Tuesday, May 20, 2025
Homeधुळेआग्र्याहून हातात मशाल घेऊन निघालेले 300 मावळे धुळ्यात दाखल

आग्र्याहून हातात मशाल घेऊन निघालेले 300 मावळे धुळ्यात दाखल

धुळे – प्रतिनिधी dhule

- Advertisement -

छत्रपती शिवाजी महाराजांचे (Chhatrapati Shivaji Maharaj) पायदळ प्रमुख नरवीर पिलाजीराव गोळे यांचे 13 वे वंशज ॲड.मारुतीराव आबा गोळे यांच्या नेतृत्वाखाली 300 मावळे शिवज्योत घेऊन आग्र्याहून निघाले असून राजगड पायी जात आहेत.

आग्रा (Agra) येथून छत्रपती शिवाजी महाराजानी आपल्या बुद्धी कौशल्याच्या जोरावर औरंगजेबाच्या (Aurangzeb) हातावर तुरी देऊन बाळराजे छ.संभाजी महाराजांसह सुटका करून घेतली. या ऐतिहासिक घटनेला 356 वर्ष पूर्ण झालीत. यानिमित्त गरुड झेप मोहिमे अंतर्गत ही पायी मशाल यात्रा काढण्यात आली आहे.

यात्रेचे धुळ्यात आज बुधवारी महाराणा प्रताप (Maharana Pratap) स्मारकाजवळ आगमन झाले. स्मारक समितीचे अध्यक्ष अजित राजपूत, शिवराणा ग्रुपचे तेजपाल गिरासे यांनी त्यांचे स्वागत केले. यात्रेतील ॲड.गोळे, दिग्विजय जेडे, विलास मोरे, आप्पा कोळी यांचा प्रातिनिधिक सत्कार करण्यात आला. यावेळी जगदीश राणा, मनजीत सिसोदिया, ॲड.शैलेश राजपूत, यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Rain News : पुढील दहा दिवस ‘अवकाळी’चे जोरदार संकट

0
नाशिक, अहिल्यानगरसह मध्य महाराष्ट्रात जोरदार पर्जन्यवृष्टीचे संकेत- उत्तमराव निर्मळ राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata आरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण होत आहे. येत्या दहा...