Saturday, May 4, 2024
Homeनगरशासनाच्या योजनांचा प्रसार व प्रसार करण्याची गरज- ना. विखे

शासनाच्या योजनांचा प्रसार व प्रसार करण्याची गरज- ना. विखे

झरेकाठी |वार्ताहर| Zarekathi

पारंपारीक शेतीला यांत्रिकीकरणाची जोड देवून कृषि क्षेत्रात नाविन्यता आणण्याचे प्रयत्न शेतकरी यशस्वीपणे करीत आहेत. केंद्र आणि राज्य सरकारच्या योजनांचा लाभ बांधापर्यंत पोहोचविण्यासाठी कृषि अधिकारी आणि कर्मचार्‍यांनी या योजनांचा प्रसार आणि प्रचार सातत्याने करण्याची गरज महसुल, पशुसंवर्धन आणि दुग्धविकास मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केली.

- Advertisement -

झरेकाठी येथे शेतकर्‍यांना कृषि योजनेच्या माध्यमातून ट्रॅक्टर, रोटा व्हेटर आणि ब्लोअरचे वितरण मंत्री ना. विखे पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आले. याप्रसगी उपविभागीय कृषि आधिकारी सुधाकर बोराळे, तालुका कृषि आधिकारी प्रविण गोसावी, मंडल कृषि आधिकारी रविंद्र वळवी, कृषि पर्यवेक्षक दत्तात्रय पोखरकर, अ‍ॅड. पोपटराव वाणी, मंगलताई वाणी जिजा बापू वाणी, गोकुळदास वाणी, कृषी सहाय्यक सचिन गायकवाड, स्वप्निल पाटील, भारत गीते, उत्तम काका मुसमाडे, कैलासनाना तांबे, नारायण काका कहार, देविदास तांबे, रोहिदास वाकचौरे, हौशीराम वाकचौरे, मधुकर वाणी यांच्यासह स्थानिक पदाधिकारी याप्रसंगी उपस्थित होते.

झरेकाठी येथील शेतकरी दादासाहेब विठ्ठल वाणी यांना कृषि योजनेतून रोटाव्हेटर, सुभाष कचरु चकोर यांना ब्लोअर, पुष्पलता दिलीप पाटील व नामदेव सावळेराम व्यवहारे आणि सोमनाथ डोळे यांना कृषि योजनेतून मंजुर झालेल्या ट्रॅक्टरचे वितरण करण्यात आले.

याप्रसंगी बोलताना मंत्री ना. विखे पाटील म्हणाले की, नैसर्गिक संकट आणि आव्हानांवर मात करुन, शेतकरी कृषि क्षेत्रातील प्रगती साध्य करीत असतो. कोव्हीड संकटात संपूर्ण जग बंदीस्त झाले असताना आमचा बळीराजा मात्र शेतामध्ये कष्ट करुन, संपूर्ण जगाची भूक भागवीत होता. देशाच्या अर्थव्यवस्थेलाही कृषि क्षेत्रानेच बळकटी दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने विविध योजनांच्या माध्यमातून कृषि क्षेत्रातील यांत्रिकीकरणाला मोठे प्रोत्साहन दिले आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या सहकार्याने या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याची जबाबदारी ही सरकार बरोबरच कृषि विभागातील आधिकारी आणि कर्मचार्‍यांची सुध्दा आहे. कृषि योजनांचा प्रसार आणि प्रचार शेतकर्‍यांच्या बांधापर्यंत जावून करा असे आवाहनही त्यांनी केले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या सरकारने सुध्दा आत्तापर्यंत घेतलेल्या निर्णयांमध्ये शेतकर्‍यांच्या हिताचे निर्णय घेतले आहेत. राज्यात अतिवृष्टीमध्ये नुकसान झालेल्या शेतकर्‍यांना मदतीचा निर्णय करतानाच नियमित कर्जफेड करणार्‍या शेतकर्‍यांना 50 हजार रुपयांचे अनुदान देण्याचा महत्वपूर्ण निर्णय नव्या सरकारने घेतला असून याची अंमलबजावणी सप्टेंबर महिन्यातच सुरु होणार असल्याची ग्वाही मंत्री ना. विखे पाटील यांनी प्रसंगी दिली.

- Advertisment -

ताज्या बातम्या