खेडलेझुंगे । वार्ताहर | Khedlezunge
परतीच्या पावसामुळे (rain) परिसरातील मका, सोयाबीन, कांद्याचे रोप, भाजीपाला, फळ पिकांचे अतोनात नुकसान (crop damage) झाले आहे. अतिवृष्टीमुळे (heavy rain) नदी, नाले, कालवे भरुन वाहत होती. कालव्यांच्या पोटचार्यांना/नाल्यांना पाणी सोडण्यात आले होते.
त्यामुळे पावसाचे आणि कालव्याचे पाणी साचून राहिल्याने शेतातील उभी पिके सडून गेली आहे. त्यामुळेे शेतकर्याच्या हाती काही लागले नाही. त्यामुळे आता रब्बी पिकांंसाठी (rabbi crop) शासनाकडून मदतीचा हात मिळावा अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे (swabhimani shetkari sanghatna) तालुकाध्यक्ष गजानन घोटेकर यांचेसह शेतकर्यांनी केली आहे. यावर्षी परतीच्या पावसाने (rain) पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान (crop damage) केले.
खरिपाचा हंगाम (kharif season) वाया गेला तर रब्बीचा हंगाम (rabbi season) करण्यासाठी शेतकर्यांना आर्थिक मदतीची गरज आहे. शासनाने मदत केली तरच शेतकरी तरणार आहे. अतिवृष्टीमुळे (heavy rain) अनेक शेतकर्यांना पिकपेरा लावणेही शक्य झाले नाही. महसुल विभागाच्या (Department of Revenue) ई-पीक पाहणी अॅपद्वारे (e-crop inspection app) शेतात जावून पीक पहाणी करणे शक्य नसल्याचे लक्षात घेऊन तसेच शेतकर्यांच्या झालेल्या नुकसानीकडे लक्ष देत राज्यातील शिंदे सरकारने मोबाईल अॅपद्वारे (Mobile app) ई पीक पाहणी अट शिथिल करून सरसकट मदत करण्याचे जाहीर केले आहे.
त्यामुळे बळीराजाला अतिवृष्टी (heavy rain) मदत 2022 सरसकट मिळणार असल्याचे स्पष्ट दिसत आहे. परंतु त्याबाबतचा लेखी अध्यादेश किंवा पत्र राज्य सरकारने जारी न केल्याने शेतकर्यांचा हिरमोड होत आहे. सदरची अट शिथिल करण्यात आली आहे असा निर्णय सरकारने फक्त घोषणा करुन केलेला आहे. नुकसानग्रस्त शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही असे आश्वासन राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे यांनी दिले आहे.
लवकरच शेतकरी (farmers) बांधवांच्या खात्यामध्ये नुकसान भरपाईची (compensation for damages) मदत जमा करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली होती. परंतु रब्बी हंगामास सुरवात होवुनही सरकार मायबापाकडून अजुनही बळीराजाला मदत मिळालेली नसल्याने शेतकरी वर्गात नाराजी दिसून येत आहे. शेतकर्यांना उभे करण्यासाठी शिंदे सरकारने तत्काळ मदत करण्याच्या दृष्टीने निर्णय घेणे गरजेचे आहे.
ज्या शेतकर्यांनी पीक विमे काढले आहे त्यांना तत्काळ मदत देणे गरजेचे आहे. अतिवृष्टी (heavy rain) आणि ढगफुटीसदृश्य पावसामुळे राज्यातील अनेक शेतकरी बांधव पीक पाहणी पासून वंचित राहिले आहे. तोंडी आश्वासनामुळे शेतकर्यांपुढे अडचण निर्माण होऊ शकते. त्यामुळे शासनाने दिलेल्या आश्वासनाप्रमाणे मदत देण्याची मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केली आहे.
शेतकर्यांनी पीक पेरा लावून घ्यावा नुकसानग्रस्त शेतकर्यांना पीक विमा लवकर मिळणे आवश्यक आहे. पीक विम्यासाठी ई पीक पाहणी करणे गरजेचे आहे. सद्यस्थितीत नुकसानीमुळे शेतकर्यांची मनस्थिती स्थिर नाही. त्यातच रब्बी हंगामासाठी आर्थिक तरतूद कशी आणि कुठून करायची असा प्रश्न शेतकर्यांपुढे असल्याने सरकारने ई-पीक पाहणी करणे सक्तीचे करू नये. परंतु शेतकरी बांधवांनी ई-पीक पाहणी आपल्या मोबाईलद्वारे किंवा तलाठी यांचेशी संपर्क करुन पीक पेरा लावून घ्यावा.
– यादव सदाफळ, चेअरमन, (सोसायटी खेडलेझुंगे)
ई-पीक पहाणी गरजेची ई-पीक पाहणीची अट पीक नुकसान भरपाईसाठी शिथिल करण्यात आली असली तरी ई पीक पहाणी करणे गरजेचे आहे. कारण ई पाहणी केल्यामुळे शेतातील पिकांची माहिती सातबारा उतार्यावर येणार आहे. तसेच पीक पाहणी केल्यामुळे भविष्यामध्ये अनेक शासकीय योजनांचा लाभ मिळण्यासाठी त्याचा फायदा होणार आहे. त्यामुळे ज्या शेतकरी बांधवांना शक्य आहे त्यांनी ई-पीक पाहणी करुन घेणे गरजेचे आहे.
– प्रकाश वैराळ, तलाठी (निमगांव वाकडा)