अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
करोनाची (Corona) दुसरी लाट हळूहळू नियंत्रणात येत असून अद्याप करोना संपलेला नाही. मात्र, जिल्ह्यातील 1 हजार 318 पैकी 821 ग्रामपंचायतींनी (Grampanchayat) यशस्वीपणे करोनावर मात केली आहे. ही बाब जिल्हा प्रशासन (District Administration), आरोग्य विभागासह (Department of Health) अन्य यंत्रणांसाठी समाधानाची ठरणार आहे.
जिल्ह्यात करोनाच्या दुसर्या लाटेत मोठ्या प्रमाणात संसर्ग झाला. यामुळे उपचार घेणार्यांची संख्या काही हजारांपर्यंत वाढली. एकवेळ तर अशी आली होती की जिल्ह्यात ऑक्सिजन बेड, ऑक्सिजनचा साठा, उपचारासाठी आवश्यक असणार्या औषधांचा तुटवडा (Shortage of medicines) होता. मात्र, आरोग्य विभाग (Health Department), जिल्हा प्रशासनाने धीर न सोडता माझे कुटूंब माझी जबाबदारी यासह करोना बाधितांच्या संपर्कात आलेल्या शेवटच्या घटकापर्यंत पोहचून बाधित रुग्णांचे विलगीकरण करून त्यांच्यावर उपचार केल्याने गेल्या महिनाभरापासून करोना संसर्ग कमी होतांना दिसत आहे.
जिल्ह्यात 1 हजार 318 ग्रामपंचायती असून 1 हजार 596 गावे आहेत. यातील अवघ्या पाच ग्रामपंचायतीमध्ये दुसर्या लाटेत करोनाचा शिरकाव झालेला नव्हता. यात कोपरगाव (Kopargav) तालुक्यातील 4 आणि नेवासा (Newasa) तालुक्यातील एका ग्रामपंचायतीचा समावेश असल्याचे जिल्हा परिषदेकडून (ZP) सांगण्यात आले. तर 28 जून अखेर जिल्ह्यातील 821 ग्रामपंचायतींनी करोनावर मात केली असून यात सर्वाधिक संगमनेर (Sangmner) तालुक्यात 101 तर नगर तालुक्यात 89 ग्रामपंचायातींचा समावेश आहे.
करोनामुक्त ग्रामपंचायती अन् कंसा एकूण ग्रामपंचायती
अकोले 79 (146), संगमनेर 101 (143), कोपरगाव 60 (75), राहाता 32 (50), श्रीरामपूर 29 (52), राहुरी 55 (83), नेवासा 39 (114), शेवगाव 72 (94), पाथर्डी 59 (107), जामखेड 47 (58), कर्जत 71 (91), श्रीगोंदा 42 (86), पारनेर 46 (114) आणि नगर 89 (105) असे आहेत.