Friday, May 16, 2025
Homeनगरग्रामसभेत प्रश्न विचारल्याने एकास मारहाण

ग्रामसभेत प्रश्न विचारल्याने एकास मारहाण

कोपरगाव |तालुका प्रतिनिधी| Kopargav

- Advertisement -

ग्रामसभेत फिर्यादीने प्रश्न विचारल्याचा राग येऊन त्यास राजेंद्र पंडितराव जाधव, विजय पंडितराव जाधव, मानसी राजेंद्र जाधव यांच्यासह 20 जणांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण करून खिशातील भ्रमणध्वनी काढून घेतला. याप्रकरणी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कोपरगाव तालुक्यातील सांगवी भुसार या ठिकाणी ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती. फिर्यादी संदीप यादव क्षीरसागर (वय 36) यांनी ग्रामसभेत मुलांच्या मैदानाबाबत व ग्रामसभेच्या आवक-जावक नोंदणी पुस्तकाबाबत प्रश्न का घेतले नाही ? याची विचारणा केली असता त्याचा राग मनात धरून आरोपी राजेंद्र पंडितराव जाधव, विजय पंडितराव जाधव, मानसी राजेंद्र जाधव, तान्हाजी गोरख जाधव, भाऊसाहेब संपत जाधव, जीवन रावसाहेब जाधव,भाऊसाहेब मुरलीधर जाधव, मच्छिंद्र रामभाऊ जाधव, रोहिदास माधव शिंदे, हरिभाऊ भागुनाथ शिंदे, सुनील परबत शिंदे, विलास रामभाऊ कासार, किशोर बबन जाधव, संदीप बबन जाधव, अजय अशोक जाधव, प्रशांत मोरे, बापूसाहेब जाधव, मोहन कासार (पूर्ण नाव माहिती नाही), साहेबराव पुंजाजी जाधव, करण नानासाहेब जाधव सर्व रा. सांगवी भुसार आदी 20 जणांनी फिर्यादीला लाथाबुक्क्यांनी व चापटेने मारहाण केल्याचे संदीप यादव क्षीरसागर यांनी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.

यातील काही आरोपींना कोपरगाव पोलिसांनी अटक केली असून घटनास्थळी पोलीस निरीक्षक वासुदेव देसले, पो.हे.कॉ. संदीप बोटे आदींनी भेट दिली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक देसले यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस पो. हे कॉ. बोटे हे करत आहेत.

ग्रामसेवकास धक्काबुक्की; गुन्हा दाखल

दरम्यान याच घटनेत परस्पर विरोधी दाखल फिर्याद दाखल करण्यात आली असून ग्रामसेवक योगेश काशिनाथ देशमुख यांच्या फिर्यादीवरून आरोपी संदीप क्षीरसागर याचे विरुद्ध शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल केला आहे. त्यांनी म्हटले आहे की, ग्रामसभा सुरु असताना आरोपी क्षीरसागर हा त्या ठिकाणी आला व त्याने इतिवृत्त वाचून का दाखवले नाही ? तुम्ही ग्रामसभा लवकर का संपवली ? माझे काही प्रश्न बाकी असताना ग्रामसभा का संपवली ? तुम्ही ठराव का मंजूर केले असे म्हणत आरोपी संदीप यादव क्षीरसागर फिर्यादी ग्रामसेवकांचे अंगावर धावून येवून त्यांची गचांडी धरून शिवीगाळ व धक्काबुक्की केली. तेथील इतिवृत्त, कच्चे ठरावांचे टिपणे फाडून टाकुन जीवे मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या फिर्यादीवरून संदीप यादव क्षीरसागर याच्या विरोधात सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

संपादकीय : १६ मे २०२५ – घे भरारी..

0
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळ संचलित दहावीच्या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. त्यात मोठ्या संख्येने विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्यांच्या पालकांसह समाजालाही त्यांच्या...