Wednesday, October 16, 2024
Homeब्रेकिंग न्यूजहरियाणा निकालाची महाराष्ट्रात पुनरावृत्ती! - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास

हरियाणा निकालाची महाराष्ट्रात पुनरावृत्ती! – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास

मुंबई | प्रतिनिधी Mumbai Mumbai

- Advertisement -

हरियाणाच्या जनतेने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवत खोटा प्रचार करणाऱ्यांना नाकारले आहे. हरियाणातील जनतेने फेक नरेटिव्हच्या विरोधात मतदान केले. त्यामुळे हरियाणात जे घडले तेच नोव्हेंबर महिन्यात महाराष्ट्रात घडेल, असा विश्वास भाजप नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी येथे व्यक्त केला. हरियाणा विधानसभेचा निकाल हा भाजपच्या कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास वाढवणारा असल्याचेही त्यांनी सांगितले.

हरियाणा विधानसभा निवडणुकीत भाजपने संपादन केलेल्या नेत्रदीपक विजयाचा जल्लोष आज प्रदेश भाजपच्या वतीने करण्यात आला. त्यावेळी कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांशी संवाद साधताना फडणवीस यांनी आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीचा विजय होईल, असा दावा केला. लोकसभा निवडणुकीत विरोधकांनी केलेल्या खोट्या प्रचाराचा भाजपला फटका बसला. अशा खोट्या प्रचाराला तशाच थेट पद्धतीने उत्तर देण्याचा निर्णय पक्षाने घेतला होता.

70th National Film Award : ज्येष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांना ‘दादासाहेब फाळके जीवनगौरव’ पुरस्कार प्रदान

लोकसभा निवडणुकीनंतर पहिली परीक्षा हरियाणा, जम्मू-काश्मीर मध्ये होती. या परीक्षेत मतदारांनी विरोधकांच्या खोट्या प्रचाराला स्पष्टपणे नाकारून नरेंद्र मोदी यांच्या विकासाच्या कार्यक्रमाला साथ दिली आहे. हरियाणामध्ये अग्नीवीर योजनेविरोधात अपप्रचार झाला. वेगवेगळया समाज घटकांत फूट पाडण्याचे कारस्थान रचले गेले. मतदारांनी हा खोटा प्रचार नाकारत मागील निवडणुकीपेक्षा भाजपला मोठे यश मिळवून दिले. विरोधी पक्षनेते झालेल्या राहुल गांधींना हरियाणाच्या जनतेने पहिली सलामी दिली असून दुसरी सलामी महाराष्ट्रात मिळेल, असे फडणवीस म्हणाले

जनतेशी बेईमानी करून निवडून आलेल्यांना जनता त्यांची जागा दाखवून देते. या निवडणूक निकालाचा अन्वयार्थ म्हणजे देशातील जनता आजही केवळ नरेंद्र मोदी यांच्या पाठीशी आहे. विरोधकांच्या नौटंकीला कुणीही भुलणार नाही हे या निवडणुकीने दाखवून दिल्याचे फडणवीस म्हणाले.

जम्मू काश्मीरमध्ये भारताचा, लोकशाहीचा विजय झाला आहे. ३७० वे कलम रद्द झाल्यानंतर तेथे रक्ताचे पाट वाहतील असे म्हणणाऱ्यांना तेथील जनतेने उत्तर दिले आहे. काश्मीरच्या जनतेवर भारतात अन्याय होतो आहे, असा प्रचार आंतरराष्ट्रीय पातळीवर करणाऱ्या पाकिस्तानला काश्मीरच्या जनतेने चपराक लगावली आहे, असेही फडणवीस म्हणाले.

- Advertisment -

ताज्या बातम्या