मुंबई | Mumbai
राज्यात पूर्णपणे मान्सून (Monsoon) दाखल झाला असला तरी अद्याप काही जिल्ह्यांत पाहिजे तसा पाऊस झालेला नाही. त्यामुळे खरीप हंगामातील (Kharif Season) पेरण्या रखडल्या आहे. तर काही ठिकाणी शेतकऱ्यांसमोर (Farmers) दुबार पेरणीचे संकट उभे ठाकले आहे. मात्र, शुक्रवारपासून राज्यात पावसाने (Rain) पुन्हा एकदा हजेरी लावल्याने बळीराजा सुखावला आहे. त्यानंतर आता हवामान विभागाने पुढील चार ते पाच दिवस राज्यात मुसळधार पाऊस कोसळेल असा अंदाज वर्तविला आहे…
Rain Update : राज्यात पुढील काही तासांत मुसळधार पावसाची शक्यता; ‘या’ ठिकाणी यलो, ऑरेंज अलर्ट
याबाबत हवामान विभागाने (Meteorological Department) दिलेल्या माहितीनुसार, येत्या चार ते पाच दिवसांत राज्यातील काही भागात जोरदार पाऊस (Heavy Rain) बरसण्याची शक्यता असून बंगालच्या उपसागरावर सीवायसीआयआरची निर्मिती झाली आहे. त्यामुळे हे नॉर्थ वेस्टच्या दिशेने आत जाण्याची दाट शक्यता असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.
तर या दोन्ही प्रणालींमुळे महाराष्ट्रासह मध्य भारतातील काही भागांमध्ये पावसाचा जोर वाढण्याची शक्यता असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. तसेच आज पुण्यासह (Pune) मराठवाड्यातील काही भागांत विजांच्या कडकडाटासह पाऊस कोसळेल असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. याशिवाय उद्या म्हणजेच सोमवारपासून राज्यातील पुणे, मुंबई, सातारा, कोल्हापूर, ठाणे, मुंबई, सिंधुदूर्ग आणि विदर्भातील सगळ्याच जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.
विरोधकांचं ऐक्य होत असतानाच, उत्तर प्रदेशमधील मोठा चेहरा NDA मध्ये सामील
तसेच १८ आणि १९ जुलै रोजी पुण्यात ऑरेंज अलर्ट (Orange Alert) जारी करण्यात आला असून याठिकाणी अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर विदर्भातील सगळ्याच जिल्ह्यांमध्ये पुढील ४ दिवस पावसाचा यलो अलर्ट (Yellow Alert) देण्यात आला असून येथे मुसळधार पाऊस हजेरी लावेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. याशिवाय मुंबईमध्ये १७ ते १९ जुलैपर्यंत मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.