Saturday, May 4, 2024
Homeमहाराष्ट्रअतिवृष्टी : देवेंद्र फडणवीस तीन दिवसांत 9 जिल्ह्यांना देणार भेट

अतिवृष्टी : देवेंद्र फडणवीस तीन दिवसांत 9 जिल्ह्यांना देणार भेट

मुंबई –

महाराष्ट्रातील मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात परतीच्या पावसाने, अतिवृष्टीने प्रचंड नुकसान झाले असून, बळीराजा पुरता हवालदिल

- Advertisement -

झाला आहे. त्यामुळे शेतकर्‍यांना दिलासा देण्यासाठी आणि झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस तीन दिवसांच्या दौर्‍यावर आहेत. 19 ऑक्टोबरपासून त्यांच्या दौर्‍याला प्रारंभ होईल.

सोमवारी देवेंद्र फडणवीस बारामतीपासून आपला दौरा प्रारंभ करतील. कुरकुंभ, इंदापूर, टेंभूर्णी, करमाळा, परंडा इत्यादी ठिकाणी दौरा करून ते उस्मानाबादकडे रवाना होणार आहेत. पुणे आणि सोलापूर जिल्ह्यांच्या प्रवासानंतर दुसर्‍या दिवशी, मंगळवारी (20 ऑक्टोबर) उस्मानाबाद, लातूर, बीड आणि परभणी या जिल्ह्यातील ठिकाणांना ते भेटी देणार आहेत. तिसर्‍या दिवशी बुधवारी (21 ऑक्टोबर) हिंगोली, जालना, औरंगाबादचा ते दौरा करतील. या तीन दिवसांत 9 जिल्ह्यांमध्ये सुमारे 850 कि.मी.चा प्रवास फडणवीस करणार आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या